बेंगळूर/प्रतिनिधी
गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जुलै महिन्यात चांगला पाऊस पडल्याने पेरणीच्या प्रमाणात २० टक्क्यांनी वाढ झाली होती, परंतु ऑगस्टमध्ये झालेल्या मुसळधार पावसाने १.४ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.
राज्याच्या कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार कर्नाटकातील ७३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास ७०लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ही एक दिलासादायक बाब आहे.
कोरोनामुळे शेतकऱ्यांना त्यांचा नियमितच्या कामात कोणताही अढथळा आलेला नाही. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत ऑगस्टच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत खरीप लागवडीच्या क्षेत्रात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, अशी माहिती कृषिमंत्री बी.सी. पाटील यांनी दिली आहे.