बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर सुरु आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येबरोबरच मृतांची संख्याही वाढत आहे. दुसऱ्या लाटेची तीव्रता लक्षात घेऊन तज्ज्ञांच्या अंदाजानुसार कोरोनाच्या तिसऱ्या लहरीमुळे लहान मुलांवर अधिक परिणाम होण्याची शक्यता आहे, त्यामुळे मुलांच्या संरक्षणासाठी कर्नाटक राज्य बाल संरक्षण हक्क आयोगाने (केएससीपीसीआर) राज्य सरकारला जिल्हा स्तरावर कार्यदल स्थापन करण्याची शिफारस केली आहे.
तसेच कोरणामुळे अनेक कुटुंब उध्वस्त झाली आहेत. अनेक बालके पोरकी झाली आहेत. यापार्श्वभूमीवरके.एस.सी.पी.सी.आर. ने राज्य सरकारला असेही आवाहन केले आहे की कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी पर्यवेक्षण समिती गठित करावी.