बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक राज्य रस्ता परिवहन महामंडळाच्या (केएसआरटीसी कर्मचारी) कर्मचार्यांनी राज्य सरकारशी चर्चा केल्यानंतर सोमवारी संप संपविला. महामंडळाच्या सर्व बससेवा सुरू झाल्यानंतर प्रवाश्यांनी सुटकेचा श्वास घेतला आहे. परिवहन मंत्र्यांबरोबर झालेल्या चर्चेदरम्यान १० पैकी ९ मागण्या मान्य केल्यांनतर हा संप मागे घेण्यात आला.
दरम्यान परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांच्याशी दीर्घ चर्चा झाल्यानंतर कर्मचार्यांच्या दहा पैकी नऊ मागण्या मान्य झाल्या. शेतकरी नेते चंद्रशेखर यांनी सोमवारी सायंकाळी फ्रीडम पार्क येथे वाहतूक कामगारांचा संप संपवण्याची घोषणा केली.
कर्नाटक राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप सुरू केला होता. कोरोना ड्यूटी दरम्यान सरकारने त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून समावेश करावा, वेतनात बदल करावा, मृत कर्मचार्यांच्या नातेवाईकांना ३० लाख रुपये द्यावेत आदी मागण्यांसाठी केएसआरटीसीचे कर्मचारी संपावर होते.