बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी आज, पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षा होणार नसल्याचे म्हंटले आहे. त्याऐवजी सीसीईच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार आहे.
२० एप्रिल रोजी बेंगळूरमध्ये जारी केलेल्या निवेदनात मंत्री एस. सुरेश कुमार यांनी शाळांना ३० एप्रिलपर्यंत मूल्यांकन प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत, तसेच विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षांना शारीरिकरीत्या उपस्थित राहण्यास सांगितले जाऊ नये, असे म्हंटले आहे.
त्यांनी असेही म्हटले आहे की सीसीई हे केवळ सैद्धांतिक शिक्षण क्षमतांचे मूल्यांकन करण्याचे साधन असावे. यामुळे शिक्षकांना शिक्षणामधील अंतर ओळखण्यास मदत होईल, ज्याला पुढील शैक्षणिक वर्षाच्या सुरूवातीस ब्रिज कोर्सचा भाग म्हणून संबोधित केले जाईल.
गेल्या शैक्षणिक वर्षात देखील कोरोनाचा उद्रेक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना कोणत्याही मूल्यांकनाशिवाय पुढील वर्गात पदोन्नती देण्यात आली. “सलग दुसर्या वर्षी कोणत्याही मूल्यांकन न करता विद्यार्थ्यांना पदोन्नती देणे चुकीचे आहे. त्यांउळे शिक्षक ब्रिज कोर्सच्या माध्यमातून मुलांचे मूल्यांकन करतील व उणीवा दूर करतील. ” असे म्हंटले आहे.
मंत्र्यांनी मात्र स्पष्ट केले आहे की इयत्ता १ ते ५ मधील सर्व विद्यार्थ्यांची पदोन्नती होणे आवश्यक आहे. तांत्रिक सल्लागार समितीची पुढील शिफारस असलेल्या या मुलांनी चालू शैक्षणिक वर्षात कोणत्याही शारीरिक वर्गात भाग घेतला नाही. इयत्ता ६ वी ते ९ वी च्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन आणि ऑफलाइन अशा दोन्ही वर्गांमध्ये भाग घेतला आहे. म्हणूनच, या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन वर्ग संवाद, प्रकल्प कार्य, गृहपाठ आणि शिकण्याच्या क्षमतांवर आधारित असावी असे म्हंटले आहे.