कलबुर्गी /प्रतिनिधी
कोरोना उपचार करताना स्वसंरक्षणासाठी वापरण्यात येणारी उपकरणे उघड्यावर येत आहे. वैयक्तिक संरक्षण उपकरणांची योग्य प्रकारे विल्हेवाट न लावल्यामुळे नवीन संकट निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात ५०० टन कोविड कचरा निर्माण झाला आहे.
राज्यात रुग्णालये, लॅब, घरे, हॉटेल्स आणि इतर ठिकाणी रुग्णांना अलग ठेवण्याच्या ठिकाणांहून जैव-वैद्यकीय कचरा साठत आहे. विशेषत: बेंगळूर म्हैसूर, मंगळूर, हुबळी, धारवाड आणि कलबुर्गी येथे कचऱ्याचे प्रमाण जास्त आहे.
टीओआयने केलेल्या तपासणीत असे दिसून आले की त्यातील बराचसा जैव-वैद्यकीय कचरा कचरा जमिनीवर टाकला जात आहे. कलबुर्गी विकास मंडळाजवळील कोविड रुग्णालयाजवळ आरोग्य कर्मचारी, रूग्णांकडून वापरल्या जाणार्या पीपीई किट आणि मास्क मोकळ्या जागेत टाकण्यात आले आहेत. ही बाब रुग्णालयात दाखल झालेल्या एका कोविड पॉझिटिव्ह जिल्हा पंचायत सदस्याने आपल्या मोबाईल मधील कॅमेरामध्ये टिपून शेअर केल्यावर अधिकाऱ्यांना जाग आली.
हुबळी येथील खासगी रूग्णालय सांभाळणारे डॉ संदीप बनकापूर यांनी जर आम्ही खुल्या भागात पीपीईची विल्हेवाट लावत असाल तर आम्ही इतरांना विषाणूच्या संपर्कात आणत आहोत, असे म्हंटले आहे.