बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकातील काही जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे. अनेक भागात मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांनी, राज्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडल्यामुळे पूर आला असल्याचे सांगत, ज्या भागात पूर आला आहे. त्या गावांतील लोकांना जवळच्या सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येईल, असे म्हंटले आहे.