बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकचे विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारी सत्ताधारी भाजप सरकारवर निशाणा साधला. सिद्धरामय्या यांनी भाजप अंतर्गत कलहामुळे गोंधळलेले असून ते राज्यातल्या कारभाराशी तडजोड करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सिद्धरामय्या यांनी कर्नाटकमधील प्रशासन भाजपमधील गोंधळामुळे त्रस्त आहे. मंत्रिमंडळ विस्तार किंवा मुख्यमंत्री बदल हे त्यांच्या पक्षातील अंतर्गत बाबी आहेत. पण याचा राज्यातील कारभारावर परिणाम होत आहे आणि ते थांबले पाहिजे, असे ते म्हणाले.
सिद्धरामय्या यांनी भाजप हाय कमांड संस्कृती, कौटुंबिक राजकारण इत्यादी विरोधात विरोधकांना लक्ष्य करीत होते. आता भाजपा हेच करत आहे आणि प्रशासनाकडेही दुर्लक्ष करीत आहे, असे ते म्हणाले.