बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटकच्या किनारपट्टी भागात हवामानाची परिस्थिती कायम असल्याने शुक्रवारी मासेमारीसाठी गेलेल्या आणि समुद्रामध्ये भरकटलेल्या नौकेवरील २४ मच्छिमारांची भारतीय तटरक्षक दलाने सुटका केली.
राज्य संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार समुद्र किनारपट्टीपासून १५ नॉटिकल मैल अंतरावर ही मच्छीमार बोट अडकल्याचा इशारा मिळाल्यावर कस्तुरबा नावाच्या गस्ती घालणाऱ्या जहाजातून बचाव अभियान राबविण्यात आले. आयएफबी कामरुल बहार नावाच्या मासेमारी करणाऱ्या बोटमधील लोकांची सुटका भाटकळ बंदरातून करण्यात आली असल्याचे म्हंटले आहे.