महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे धावल्या बसेस : कर्नाटकात लालपरीचा पत्ताच नाही
प्रतिनिधी /बेळगाव
काही महिन्यांपासून बंद असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवेला मंगळवारपासून प्रारंभ झाला. मध्यवर्ती बसस्थानकातून महाराष्ट्राच्या विविध शहरांकडे बसेस धावल्या. पहिल्या दिवशी काही मोजक्मयाच बसेस धावल्या असल्या तरी हळूहळू बसफेऱयांमध्ये वाढ होईल, अशी माहिती परिवहनने दिली आहे.
बेळगाव विभागातील चार आगारांसह रामदुर्ग, बैलहोंगल, खानापूर या आगारांतून कोल्हापूर, मुंबई, नाशिक, ठाणे, सोलापूर, जोतिबा, रत्नागिरी, विशालगड, पंढरपूर आदी ठिकाणी बस धावल्या. दरम्यान महाराष्ट्रात कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने कर्नाटकच्या बसना प्रवाशांचा प्रतिसादही वाढला होता. मंगळवारी महाराष्ट्रात 10 ते 15 बस धावल्या असल्या तरी येत्या काळात बसफेऱयांची संख्या वाढणार आहे.
कोरोनामुळे काही महिन्यांपासून कर्नाटक-महाराष्ट्र आंतरराज्य बससेवा ठप्प झाली होती. त्यामुळे महसुलावर मोठा परिणाम झाला होता. अखेर कर्नाटक परिवहनने महाराष्ट्रात बस सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार महाराष्ट्रातील प्रमुख शहरांकडे बस धावल्या. त्यामुळे आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांना दिलासा मिळाला. बेळगाव आगारासह निपाणी, चिकोडी, गोकाक, हुक्केरी, संकेश्वर आदी बसस्थानकांतून महाराष्ट्रात आंतरराज्य प्रवासासाठी बस धावल्या.
कोरोना लॉकडाऊनमुळे आंतरराज्य बससेवेवर मोठा परिणाम झाला होता. दरम्यान आंतरराज्य प्रवास करणाऱया प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागला होता. तसेच कर्नाटक हद्दीपर्यंत प्रवास करून तेथून पुढे महाराष्ट्र हद्दीपर्यंत चालत जावून प्रवाशांना प्रवास करण्याची वेळ आली होती. मात्र आता बेळगाव विभागातून महाराष्ट्रात हळूहळू बसफेऱया वाढविल्या जात आहेत.
लालपरीचा अद्याप पत्ता नाही
बेळगाव विभागातून महाराष्ट्रातील विविध शहरांकडे काही प्रमाणात बससेवा सुरू झाली असली तरी महाराष्ट्राच्या लालपरीचा अद्याप पत्ता नाही. महाराष्ट्राची लालपरी कर्नाटकात अद्याप सुरू झाली नाही. महाराष्ट्रात कर्मचाऱयांचा संप सुरू असल्याने बससेवा पूर्ण क्षमतेने सुरू झाली नाही. त्यामुळे कर्नाटकात धावणारी लालपरी अद्याप ठप्पच आहे.
प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱया वाढविणार
कोल्हापूर, सांगली वगळता महाराष्ट्राच्या इतर शहरांकडे बसेस सोडल्या गेल्या आहेत. हळूहळू सर्व बसेस महाराष्ट्रात सुरू केल्या जाणार आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस खात्याचे सहकार्य घेतले जात आहे. परिस्थिती पाहून बसफेऱया वाढविल्या जाणार आहेत.
पी. वाय. नाईक, (विभागीय नियंत्रण अधिकारी)