बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात नेतृत्व बदलल्याची चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी बुधवारी आपण मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट केले.
राज्यात बऱ्याच दिवसांपासून भाजपमध्ये नेतृत्व बदलाबाबत उलट सुलट चर्चा सुरु आहे. पण मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी राज्यातील प्रमुख नेते आपणच असू आणि आपण मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करू असे म्हंटले आहे.
येडियुरप्पा यांनी म्हैसूर जिल्ह्यातील मुदुकुथोर येथील मल्लिकार्जुन स्वामी मंदिर प्रकल्पासाठी त्यांनी दहा कोटी रुपयांची घोषणा केली आणि दुसऱ्या टप्प्यात अतिरिक्त निधी देण्याचे आश्वासन दिले. यावेळी त्यांनी मी मुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असे पत्रकारांशी बोलताना म्हंटले आहे.
येडियुरप्पा विविध विकास कामे सुरू करण्यासाठी तीन दिवसांच्या म्हैसूर आणि चामराजनगर दौर्यावर आहेत, येत्या दोन दिवसांत पक्षाचे उच्च पदाधिकारी कॅबिनेटच्या विस्तारास मान्यता देतील, असेही ते म्हणाले.