बेंगळूर/प्रतिनिधी
राज्य सरकारने संक्रांती महोत्सवानंतर प्रथम वर्षाच्या पदव्युत्तर, प्रथम व द्वितीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्यासाठी तारीख व तपशीलवार वेळापत्रक लवकरच जाहीर केले जाईल.
बेंगळूर येथे शुक्रवारी उच्च शिक्षणमंत्री डॉ. सी. एन. अश्वथ नारायण यांच्या अध्यक्षतेखाली राज्य सरकारच्या विद्यापीठांच्या कुलगुरूंशी झालेल्याआभासी बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला.
तारखा निश्चित करण्यासाठी पहिल्या वर्षाच्या पदव्युत्तर, प्रथम व द्वितीय वर्षाच्या पदवीधर अभ्यासक्रमांसाठी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्याची सूचना मंत्र्यांनी कुलगुरूंना केली आहे.
अंतिम वर्षाच्या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरू झाले व यशस्वीरित्या चालू असल्याने प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याची मागणीही केली जात आहे.
या मागणीनंतर मंत्र्यांनी यासंदर्भात कुलगुरूंची मते जाणून घेण्यासाठी बैठक बोलावली. बैठकीस उपस्थित असलेल्या कुलगुरूंनी सकारात्मक प्रतिसाद देत सरकारला अन्य ग्रेडसाठीही ऑफलाइन वर्ग पुन्हा सुरू करण्याचा सल्ला दिला.
बैठकीनंतर बोलताना अश्वथ नारायण यांनी अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचे वर्ग यशस्वीरित्या घेतले जातात आणि आम्ही विद्यापीठ अनुदान आयोग आणि कोरोना प्रोटोकॉलच्या सर्व सुरक्षा प्रक्रियेचे पालन करून संक्रांतीनंतर इतर वर्गांसाठीही ऑफलाइन वर्ग सुरू करू, असे म्हंटले. दरम्यान जेव्हा दहावी आणि १२ वीचे वर्ग कोणत्याही व्यत्यय न येता घेण्यात येतात तेव्हा उच्च वर्ग का घेऊ शकत नाही?” अशी विचारणा कुलगुरूंनी केली.