बेंगळूर/प्रतिनिधी
घरातील आणि मैदानी विवाहसोहळ्यांमध्ये पाहुण्यांची संख्या अनुक्रमे १०० आणि २०० पर्यंत मर्यादित ठेवल्यानंतर राज्य सरकारने कोविड -१९ चा प्रसार रोखण्यासाठी सरकारने विवाह सोहळे आणि मेळाव्यासाठी आणखी कडक नियमांची घोषणा केली.
विवाह सोहळ्यासाठी हॉल बुक करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची परवानगी आता अनिवार्य असणार आहे. तसेच आयोजकांनी सोहळ्यास उपस्थित असलेल्या पाहुण्यांना पास देणे आवश्यक आहे. १७ एप्रिलपूर्वी सभागृहे बुक केलेल्या नागरिकांना या अटी लागू होणार नाहीत. तसेच कोरोनाची संख्या वाढत असल्याने सरकारने पुढील सूचना येईपर्यंत गावमेळावे आणि धार्मिक कार्यांवर बंदी घातली आहे.
महसूलमंत्री आर अशोक, गृहमंत्री बसवराज बोम्माई आणि आरोग्यमंत्री के. सुधाकर यांनी उपायुक्त, एसपी आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांसमवेत व्हिडिओ कॉन्फरन्स घेत राज्यभरातील साथीच्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपाययोजना निश्चित केल्या.