बेंगळूर/प्रतिनिधी
सादर करण्यात येणाऱ्या आगामी अर्थसंकल्पाच्या विविध मुद्यांवर मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक घेत २०२०-२१ आणि पुढील वर्षी २०२१-२२ साठीच्या अर्थसंकल्पावर चर्चा केली. सुमारे दोन तास चाललेय बैठकीत मुख्यमंत्र्यांनी या बैठकीत प्रशासकीय अधिकाऱ्यांना राज्यातील नेतृत्व परिवर्तनाबाबत होणाऱ्या वक्तव्यांकडे लक्ष देऊ नये तसेच सर्वांनी अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्याची योजना आखण्याचे निर्देश दिले आहेत.
या बैठकीला राज्याचे मुख्य सचिव पी. रविकुमार आणि विविध विभागांचे प्रधान सचिव उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, साथीच्या आजारामुळे महसूल संकलनात मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत विकासकामांसाठी संसाधने वाढवण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. ते म्हणाले की, राज्यात प्रलंबित असलेल्या विकासकामांसाठी ३० हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यानंतरही अद्याप २०-२५ हजार कोटी रुपयांची गरज असल्याचे म्हंटले आहे.
मागील वर्षी महसूल वसुली हवी तशी झाली नसल्यामुळे बर्याच योजना राबविणे शक्य झाले नाही. या आर्थिक वर्षात अशा योजना राबविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. उत्पादन शुल्क, शिक्के व नोंदणी व परिवहन यासारख्या उत्पन्नाचे प्रमुख स्त्रोत यावर्षी ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. अशा विभागांमध्ये येत्या काही दिवसांत अधिक कर जमा करावा. तरच विकासकामांच्या अनुदानाचे वाटप होईल.
या तीन विभागांमध्ये सुमारे २० हजार कोटींचे अपेक्षित महसूल संकलन वर्ष २०२०-२१ मध्ये झाले नाही. आर्थिक परिस्थिती सुधारण्यास कित्येक महिने लागतील, म्हणूनच २०२१-२२ चे बजेट नवीन कार्यक्रमांच्या बदल्यात पूर्वी जाहीर केलेल्या कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष केंद्रित करेल