बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात येत्या काळात सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट न झाल्यास सध्या सुरू असलेला लॉकडाउन ७ जूनच्या पुढेही कायम ठेवावा लागेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात सक्रिय रुग्णांच्या संख्येत वेगाने घट होणे आवश्यक आहे, असे न झाल्यास राज्याला लाॅकडाऊन वाढविण्याशिवाय पर्याय नसेल. जर कोरोना नियंत्रणात ठेवायचा झाल्यास सरकारला कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
कर्नाटकातील सक्रिय रुग्ण संख्येबाबत भारतीय विज्ञान संस्थेच्या (आयआयएससी) वैज्ञानिकांनी केलेल्या नव्या विश्लेषणाचे काही केंद्रबिंदू आहेत, जे असे दर्शवितात की वास्तविक सक्रिय प्रकरणांची संख्या अंदाजित आकडेवारीपेक्षा जास्त आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत घट न झाल्यास लॉकडाऊन पुढे वाढवावा लागणार असल्याचे म्हंटले आहे. दर्म्य, राज्यात २७ मे रोजी, सक्रिय रुग्णांची संख्या ३.८८ लाखांपेक्षा कमी असायला हवी होती. पण वास्तविकतेमध्ये ती संख्या ४.०२ लाखाच्या वर आहे.
आय.आय.एस.सी. मध्ये संगणकीय व डेटा विज्ञान विभाग अध्यक्ष प्रोफेसर शशिकुमार यांनी स्पष्टीकरण दिले की,“ राज्यात आपण जे पहात आहोत आज सक्रिय प्रकरणांची संख्या जास्त असल्याने परिस्थिती चिंताजनक आहे. “कोरोना रुग्णसंख्या हे सूचित करते की लॉकडाऊनमध्ये काहीतरी चूक झाली आहे आणि यामुळे कर्नाटकात रुग्ण वाढल्याने लॉकडाऊन करावा लागेल,” असे मत प्राध्यापक शशिकुमार व्यक्त केले.