बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी राज्यात सत्ता परिवर्तन होण्याची शक्यता नाकारली आहे. मुख्यमंत्र्यांनी मी मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ पूर्ण करणार असल्याचे सांगितले. तसेच सत्ता परिवर्तनासंदर्भात होणारी विधाने ही निरर्थक असून याकडे लक्ष देऊ नये असे ते म्हणाले.
पत्रकारांशी बोलताना येडियुरप्पा यांनी राज्यातील नैसर्गिक आपत्ती व त्यानंतरच्या कोरोनाच्या साथीच्या रोगामुळे मागील एक वर्ष त्यांच्या सरकारसाठी अग्निपरीक्षा होती. तसेच कर्नाटक देशाच्या विकासाच्या नकाशावर प्रथम स्थान गाठावे अशी सरकारची इच्छा आहे, असे ते म्हणाले.
राज्याच्या विकासावर संपूर्ण लक्ष
मुख्यमंत्र्यांनी जिथे नेतृत्व बदलाचा प्रश्न आहे, त्याबद्दल त्यांना कधीही चिंता नव्हती. त्यांचे संपूर्ण लक्ष राज्याच्या विकासावर आहे. येडियुरप्पा यांचे वाढते वय पाहता, भाजप हाय कमांड त्यांना मुख्यमंत्रीपदावरून हटवू शकेल असा अंदाज वर्तविला जात आहे. मात्र, राज्य भाजपनेही अशी विधाने नाकारली आहेत.