शहरी भागात एक हजार जागी २५० रुपये, ग्रामीण भागात ५०० च्या जागी १०० रुपये
बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना सरकारने मास्क न घातल्यास हजार रुपये दंडाची तरतूद केली होती. पण वाढत्या विरोधामुळेमास्क न घालता तर जबर दंड वसूल करण्याच्या निर्णयावरून राज्य सरकारने बुधवारी पुन्हा यू टर्न घेतला. नियमानुसार मास्क न घातल्यास किंवा चुकीच्या पद्धतीने मास्क घातल्यास राज्य सरकारने केलेली दंडाची रक्कम कमी केली आहे. आता शहरी भागात एक हजार रुपयांऐवजी दंड म्हणून२५० रुपये मोजावे लागतील, तर ग्रामीण भागात ५०० रुपयांऐवजी दंड म्हणून १०० रुपये द्यावे लागतील. काही दिवसांपूर्वी सरकारने दंडाची रक्कम वाढविली होती. राज्यात कोरोना प्रकरण उघडकीस आल्यानंतर गेल्या सहा महिन्यांत जनतेच्या विरोधामुळे दुसऱ्यांदा दंडाच्या निर्णयावर सरकारला माघार घ्यावी लागली आहे.
बुधवारी मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी निवेदनाद्वारे दंडाची रक्कम कमी करण्याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांनी दंड रक्कम कमी करण्याचा निर्णय लोकांचा विरोधामुळेमागे घेण्यात आला असून दंडाच्या रकमेत कपात करण्यात आली आहे. तसेच नवीन दंड रक्कम तातडीने अंमलात आणली असल्याचे म्हंटले आहे.