बेंगळूर/प्रतिनिधी
सरकीय प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांच्या संख्येत विक्रमी वाढ झाली आहे. गेल्या १४ वर्षांत प्रथमच एवढी उचांकी अशी वाढ झाली आहे. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाच्या आकडेवारीनुसार २३ सप्टेंबरपर्यंत मागील वर्षीच्या तुलनेत १.० लाख विद्यार्थ्यांनी सरकारी शाळांमध्ये प्रवेश घेतला आहे.
मागील वर्षापर्यंत, सरकारी शाळांमध्ये शिकणार्या १.०५ कोटी मुलांपैकी ८५ लाख मुलांनी पुन्हा प्रवेश नोंदविला आहे. अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ४५ लाख मुलांना प्रवेश देण्यात आला आहे. ४० लाख मुले सरकारी शाळांमध्ये दाखल झाली आहेत. प्रवेश प्रक्रिया ३० सप्टेंबरपर्यंत सुरू राहतील.
आरोग्य विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सन २००६-०७ मध्ये सरकारी शाळांमध्ये ५३.४ लाख मुले दाखल झाली होती. परंतु सन २०१९-२० मध्ये त्यांची संख्या कमी होऊन ४१.२६ लाखांवर गेली. दरवर्षी दीड लाख मुले कमी होत होती. परंतु यावर्षी मात्र विद्यार्थी प्रवेशामध्ये वाढ झाली आहे.
राज्यात ४८ हजाराहून अधिक सरकारी शाळा आहेत. यापैकी ३१ हजाराहून अधिक शाळांमध्ये नवीन मुलांची संख्या वाढली आहे. मुलांची संख्या २ ते ५० टक्क्यांपर्यंत वाढली.