बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. त्याचबरोबर मृत्यूंची संख्याही वाढत आहे. परंतु राज्य सरकार ही माहिती लपवून आपल्या अपयशावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न करीत आहे. असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एच. के. पाटील यांनी सरकारवर टीका केली आहे.
पाटील यांनी शहरातील आंतरराष्ट्रीय ऑब्जेक्ट प्रदर्शनाच्या आवारात उभारण्यात आलेलं कोरोना मेडिकल सेंटर बंद करण्याच्या निर्णयाने राज्य सरकारने निष्काळजीपणाचे संकेत दिले आहेत आणि ते लवकरच मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे म्हंटले आहे.
पाटील यांनी कोरोना संसर्गामुळे होणाऱ्या मृत्यूविषयी राज्य सरकारने अचूक माहिती द्यावी. राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिलेली आकडेवारी वास्तविकतेशी जुळत नाही. यासंदर्भात इतर स्त्रोतांकडून उपलब्ध असलेली माहिती ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण जारी करावे असे म्हंटले आहे. तसेच कोरोना साथीच्या संसर्गाला ६ महिने झाले तरी या वैद्यकीय यंत्रणेत कोणतीही सुधारणा झालेली नाही. केवळ औषधाच्या नावाखाली महसूल लुटला गेला आहे.
दरम्यान कॉंग्रेसचे आमदार जमीर अहमद खान यांच्यावरील आरोपांबद्दल त्यांनी जमीर यांनी स्वतः या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कोणतीही चौकशी केल्याशिवाय निराधार आरोप करणे योग्य नाही असे पाटील यांनी म्हंटले आहे.