बेंगळूर/प्रतिनिधी
कोरोना काळात प्रतीक्षेत असणारा कर्नाटकच्या बारावी म्हणजेच पीयूसी परीक्षेचा निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी याविषयी माहिती दिली. या निकालामुळे विद्यार्थ्यांची असणारी निकालाची प्रतीक्षा संपली आहे.
शिक्षणमंत्र्यांच्या मते, यावर्षी एकूण ६१.८० टक्के विद्यार्थी या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षी ६१. ७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी काहीअंशी निकाल वाढीव लागला आहे. यामध्ये उडुपी -.९०. ७१ टक्के ( २०१९ मध्ये ९२.२टक्के), दक्षिणा कन्नड -. ९०. ७१ टक्के (२०२९ मध्ये ९०.९१ टक्के) आणि कोडगू जिल्हा – . ८१.५३ पास टक्के (२०१९ मध्ये ८३.३१ टक्के) निकाल लागला आहे.
विषयानुसार उत्तीर्ण टक्केवारी : कला ४१.२७ टक्के (२०१९ मध्ये ५०.५३%), वाणिज्य ६५ .५२ टक्के (२०२९ मध्ये ६६.३९ टक्के ) आणि विज्ञान ७६.२ टक्के (२०१९ मध्ये ६६.८ %). परीक्षा दिलेल्या एकूण 5,56,267 विद्यार्थ्यांपैकी 3,84,947 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.