बेंगळूर/प्रतिनिधी
मुख्यमंत्री बी.एस. येडियुरप्पा यांनी पोटनिवडणुकीनंतर मंत्रिमंडळ विस्ताराचे आश्वासन दिले होते. पण २० नोव्हेंबरपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. बिहारमध्ये सरकार स्थापने आणि दिवाळी यामुळे पक्षाचे केंद्रीय नेते उपलब्ध नसल्याचे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले आहे. केंद्रीय नेतृत्व जोपर्यंत आदेश देत नाहीत तोपर्यंत विस्तार करता येणार नाही. येडियुरप्पा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व अन्य केंद्रीय नेत्यांसमवेत भेटीची मागणी केली आहे. पण तेदेखील २० नोव्हेंबरपर्यंत वेळ देऊ शकत नाहीत.
दरम्यान, एमएलसीचे आर. शंकर आणि एच. विश्वनाथ हे दोन इच्छुक बुधवारी अमित शाह यांना भेटू शकले नाहीत. नंतर विश्वनाथ यांनी मंत्री रमेश जारकिहोळी यांची भेट घेतली. बंडखोरी करत त्यांनी आधीचे कॉंग्रेस-जेडीएस युती सरकार पाडले व भाजपला सत्तेत आणले.
नवनिर्वाचित आमदार एन. मुनिरथना यांनीही जारकिहोळी यांची भेट घेतली. सर्व बंडखोरांना मंत्रिमंडळात समाविष्ट करण्याच्या आश्वासनानुसार बंडखोर सत्ताधाऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे राजकीय निरीक्षकांनी सांगितले.
परंतु मंत्रिमंडळ विस्तारासाठी केंद्रीय नेतृत्वाची मंजूरी अनिवार्य असल्याने मुख्यमंत्री यांचे हात बांधलेले आहेत. गेल्या वेळीही येडियुरप्पा यांनी दिल्ली भेटीदरम्यान होकार मिळाला नव्हता, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुनिरत्न आणि तीन एमएलसी सोडून, पक्षात नवीन प्रवेश करणारे, उमेश कत्ती यांच्यासह भाजपाच्या जुने नेते मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यास उत्सुक आहेत.