ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. या परिस्थितीतून बाहेर पडण्यास केंद्र सरकारने अनेक निर्णय घेत आहे. त्यातच आता केंद्र सरकारने महागाई भत्ता न वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
सरकारच्या या निर्णयावर भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, सध्याच्या घडीला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांबाबत मोदी सरकारने असा निर्णय घ्यायला नको होता.
केंद्र सरकारने जुलै पर्यंत महागाई भत्ता स्थगित केल्याच्या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले, सरकारी कर्मचारी आणि सशस्त्र दलाशी संलग्नित कर्मचाऱ्यांबाबत कठोर निर्णय घेण्याची कोणतीही गरज नव्हती.
देशातील 54 लाख सरकारी कर्मचारी आणि 65 लाख निवृत्तीवेतन धारकांना केंद्र सरकारच्या निर्णयामुळे महागाई भत्त्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.