पालकमंत्री जयंत पाटील यांची पंतप्रधान मोदींना विनंती
प्रतिनिधी / इस्लामपूर
कर्मवीर भाऊराव पाटील (अण्णा) यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे, अशी मागणी जलसंपदा मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांनी तीन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली होती.
बहुजन समाजाच्या आर्थिक व शैक्षणिक जडणघडणीत मोलाचा हातभार लावून सर्वसामान्यांचे स्थान उंचावण्याचे काम करणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील यांना केंद्र शासनाने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात या मागणीचे पत्र पालकमंत्री जयंत पाटील यांनी ०९ मे २०१८ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवले होते. आज पुन्हा कर्मवीरांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांना ‘भारतरत्न’ पुरस्काराने सन्मानित केले जावे यावर निर्णय घ्यावा, अशी विनंती जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे.