बेळगाव : / प्रतिनिधी
देशात चौथ्या लॉकडाऊनला सुरुवात करण्यात आली असून काही प्रमाणात शिथिलता वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत आहे.
कोरोनामुळे तब्बल दीड महिन्याहून अधिककाळ बाजारपेठ बंद होती. या काळात जीवनावश्यक साहित्य मिळविताना नागरिकांचे हाल झाले. गेल्या आठ-दहा दिवसांपासून बाजार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची गर्दी वाढत आहे.
शहरातील मारुती गल्ली, गणपत गल्ली, समादेवी गल्ली, रामदेव गल्ली, रविवार पेठ, कलमठ रोड, काकतीवेस आदी भागात नागरिकांची वर्दळ वाढली आहे. रविवारपेठेत दुचाकी-चारचाकीसह अवजड वाहनांची ये-जा वाढली आहे. सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अद्यापही काही रस्ते बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे कलमठ रोडवर वाहतुकीची कोंडी होत आहे.