आज भाद्रपद पौर्णिमा आहे. या पवित्र दिवशी श्रीमद भागवत ग्रंथ सोन्याच्या सिंहासनावर ठेवून दान करावा असे श्रीमद भागवत ग्रंथामध्ये सांगितले आहे.
प्रौ÷पद्यां पौर्णमास्यां हेमसिंहसमन्वतिम् । ददाति यो भागवतं स याति परमां गतिम् अर्थात भाद्रपद पौर्णिमेला सुवर्णाच्या चौरंगासह भागवत ग्रंथाचे जो दान करतो त्याला परम गती लाभते. संत तुकाराम महाराज एका अभंगात सांगतात, आपुलिया हिता जो असे जागता धन्य मातापिता तयाचिया ।।1।।कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक । तयाचा हरिख वाटे देवा ।।2।।गीता भागवत करिशी श्रवण । अखंड चिंतन विठोबाचे ।।3।।तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा । तरी माझ्या दैवा पार नाही ।।4।अर्थात जो आपल्या मनुष्य जन्माचे हित कशामध्ये हे जाणतो त्यांचे मातापिता धन्य आहेत. ज्यांच्या कुळात सात्विक विचाराचे कन्यापुत्र जन्माला येतात. त्यांचा प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णालाही आनंद होतो. जेथे भगवद्गीता आणि श्रीमद् भागवत यांचे नित्य श्रवण होते, त्याचप्रमाणे अखंड विठ्ठल नामाचे चिंतन होते, तुकाराम महाराज म्हणतात अशा घरातील वैष्णवांची सेवा मला मिळाली तर माझ्या भाग्याला सीमा नाही.
यात महत्त्वाचा उपदेश आहे की दररोज गीता भागवत ग्रंथाचे वाचन करावे, यातच मनुष्य जीवनाचे हित आहे कारण श्रीमद् भागवत हे कलियुगातील लोकांसाठी आचारसंहिता आहे. ज्याला आपण भारतामध्ये हिंदू धर्म म्हणून समजतो तो वास्तविक वैदिक धर्म आहे. वैदिक म्हणजे ज्ञानावर आधारित अर्थात भागवत ग्रंथांमधील ज्ञानावर आधारित म्हणून याला भागवत धर्म असेही संबोधले जाते. श्रीमद् भागवत ग्रंथ हा सर्व वैदिक ज्ञानाचे सार आहे जे कलियुगातील लोकांच्यासाठी खास व्यासदेवानी कथित केले आहे. कलियुग हे घोर अंधकारमय युग गणले गेले आहे. या युगातील लोक अज्ञानरूपी अंधकारामध्ये राहत आहेत, त्यांना प्रकाश देण्यासाठी या ग्रंथाची रचना केली गेली आहे. कलियुग हे कलह आणि दंभ यांनी भरलेले युग आहे. आपण पाहत आहोत की अनेक जाती धर्म, देश, लिंग, गरीब श्रीमंत अशा अनेक गोष्टींमध्ये समाज विभागलेला आहे एवढेच नव्हे तर एकमेकांमध्ये वितुष्ट निर्माण होऊन युद्धजन्य परिस्थिती निर्माण होत आहे. पण त्याचवेळी श्रील प्रभुपाद यांच्या अथक प्रयत्नामुळे अनेक देशातील अनेक जातीधर्माचे लोक एकत्र येऊन हरिनाम संकीर्तनामध्ये करोडोच्या संख्येने सहभाग घेत आहेत, ही सर्वाना एका छत्राखाली आणण्याची किमया श्रील प्रभुपाद यांनी श्रीमद भागवत ग्रंथाचे ज्ञान सर्व जगात आपल्या उतारवयात प्रचार करून घडवून आणली आणि त्यांच्या प्रेरणेने हे कार्य आजही सर्व जगभर चालू आहे.श्रीमद् भागवतमध्ये सांगितले आहे की, कृष्णे स्वधामोपगते धर्मज्ञानादिभिः सह । कलौ नष्टद ।शामेष पुराणार्को।़धुनोदितः ।अर्थात हे भागवत पुराण सूर्याप्रमाणे तेजस्वी असून भगवान श्रीकृष्णांनी स्वधामात गमन केल्यानंतर तात्काळ त्याचा उदय झाला आहे. या कलियुगात अज्ञानरूपी निबिड अंधकाराने दृष्टीहीन झालेल्या लोकांना या पुराणापासून प्रकाश प्राप्त होईल. या कलियुगाच्या घोर अज्ञानरूपी अंधकारातून बाहेर पडण्याची ज्या प्रामाणिक लोकांची इच्छा आहे त्यांनी गीता आणि भागवत या दोन ग्रंथांचे अध्ययन करावे आणि अनुसरण करण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट सफल होईल.
या ग्रंथामध्ये आपल्या या जगातील दुःखाचे मूळ कारण विस्तारित रूपात वर्णन केले आहे. यया सम्मोहितो जीव आत्मानं त्रिगुणात्मकम् । परो।़पि मनुते।़नर्थं तत्कृतं चाभिपद्यते । अर्थात जीव जरी प्रकृतीच्या तीन गुणापलीकडे असला तरी बहिरंग शक्तीमुळे तो स्वतःला प्राकृतिक पदार्थ मानतो आणि परिणामस्वरूप त्याला नको असलेली दुःखे स्वतः ओढवून घेतो. या दुखी परिस्थितीतून कायमचे बाहेर पडण्याचा मार्ग पुढील श्लोकात वर्णन करण्यात आला आहे. अनर्थोपशमं साक्षाद्भक्तियोगमधोक्षजे ।लोकस्याजानतो विद्वांश्चपे सात्वतसंहिताम् ।अर्थात जीवाला नको असणारी दुःखे भक्तियोगाने प्रत्यक्षपणे क्षीण होतात परंतु सामान्य लोक हे जाणत नाहीत, म्हणून विद्वान व्यासदेवांनी परम सत्यासंबंधी या भागवत साहित्याची रचना केली. त्याचप्रमाणे आपल्या जीवनातील दुःख, भ्रम, भीती दूर करण्यासाठी काय करावे हे सांगताना भागवत वर्णन करतो की यस्यां वै श्रूयमाणायां कृष्णे परमपूरुषे । भक्तिरुत्पद्यते पुंसः शोकमोहभयापहा ।अर्थात भागवत ग्रंथाचे केवळ श्रवण करून परम पुरुष भगवान श्रीकृष्णाच्या प्रेममयी भक्तीची भावना अंकुरित होते आणि त्याच क्षणी दुःख, भ्रम आणि भीतीचे निराकरण होते. आपल्याला दररोज काही तरी ऐकण्याची इच्छा असते. जर आपण दररोज भागवत श्रवण केले तर आपल्याला कळेल की जीवनाचा उद्देश काय आणि तो कसा प्राप्त करावा आणि त्यासाठी भागवत आपल्याला मार्गदर्शन करते. हा श्रीमद भागवत ग्रंथ आपल्या जीवनाचा पाया असला पाहिजे. लहानपणापासूनच या ग्रंथातील आदेशांचे पालन करण्यास आपण शिकले पाहिजे. याचे वर्णन करताना प्रल्हाद महाराज म्हणतात कौमार आचरेत्प्राज्ञो धर्मान्भागवतानिह । दुर्लभं मानुषं जन्म तदप्यध्रुवमर्थदम् ।अर्थात श्रीप्रल्हाद महाराज म्हणाले, जो मनुष्य खऱया अर्थाने बुद्धिमान आहे, त्याने जीवनाच्या अगदी प्रारंभापासूनच अर्थात कौमार्यावस्थेपासूनच मानवी देहाचा उपयोग भक्तिमय सेवेच्या आचरणासाठी करावा आणि असे करीत असताना इतर सर्व कार्यांचा त्याग करावा. मानवी देह अत्यंत दुर्लभ आहे आणि जरी तो इतर देहाप्रमाणेच क्षणभंगुर असला, तरी अर्थपूर्ण आहे. कारण मनुष्य मानवी देहाच्या साहाय्याने भक्तिमय सेवा करू शकतो. मनुष्याने केलेली अगदी अत्यल्प भक्तिमय सेवादेखील त्याला सर्वोच्च पूर्णत्व प्रदान करू शकते. मानवी जीवन परिपूर्ण करण्यासाठी केवळ दोनच ग्रंथ वास्तविक आपल्यासाठी पुरेसे आहेत ते म्हणजे भगवत गीता आणि श्रीमद भागवत. हे दोन्ही ग्रंथ जर आपण जीवनामध्ये पालन करण्याचा प्रयत्न केला तरी मनुष्य जीवन परिपूर्ण होते. मग आपल्याला इतर कोणतेही ग्रंथ वाचण्याची गरज नाही आणि त्याचे आकर्षणही राहत नाही. याचे वर्णन करताना भागवत ग्रंथामध्ये सांगितले आहे. श्रीमद भागवत हे अमल, ‘निष्कलंक’ पुराण आहे. ते परमहंसांना प्राप्त होणारे निर्मळ ज्ञान प्रदान करीत असल्यामुळे वैष्णवांना अतिशय प्रिय आहे. हे भागवत दिव्य ज्ञान, वैराग्य आणि भक्तीसहीत कर्मबंधनातून मुक्तीचा मार्ग प्रदर्शित करते. जो मनुष्य भक्तिपूर्वक श्रीमद् भागवताचे अध्ययन, श्रवण आणि कीर्तन करतो तो मुक्त होतो. निम्नगानां यथा गङ्गा देवानामच्युतो यथा । वैष्णवानां यथा शम्भुः पुराणानामिद तथा ।
अर्थात नद्यांमध्ये जशी गंगा, देवांमध्ये जसे भगवान अच्युत आणि वैष्णवांमध्ये जसे शंकर तसे सर्व पुराणामध्ये हे भागवत पूर्ण श्रे÷ आहे.
सर्ववेदान्तसारं हि श्रीभागवतमिष्यते।
तद्रसामृततृप्तस्य नान्यत्र स्याद्रतिः क्वचित् । अर्थात भागवत सर्व वेदान्ताचे सार आहे. भागवत कथामृताचे रसास्वादन केल्यावर मनुष्याला दुसऱया कोणत्याही वाङ्मयाचे आकर्षण वाटत नाही. त्यासाठी प्रत्येकाच्या घरी हा श्रीमद भागवत ग्रंथ असावयास हवा. या ग्रंथामध्ये धर्मासहित आधुनिक विज्ञानालाही न गवसलेले ज्ञान आहे. भारतामध्ये श्रीपाद मध्वाचार्य, श्रीपाद रामानुजाचार्य, संत तुकाराम महाराज अशा अनेक आचार्यांनी या ग्रंथाच्या आधारावर भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार केला आणि स्वामी श्रील प्रभुपाद यांनी तर संपूर्ण विश्वामध्ये अनेक भाषांमध्ये या ग्रंथाचे भाषांतर करून सर्व जग भागवत धर्माच्या शिकवणीनुसार वागल्यास जगामध्ये कशी एकात्मता, शांती व सद्भावना जपता येते हे संपूर्ण जगाला दाखवून दिले.
-वृंदावनदास