बांध काढून वाहतूक सुरू : प्रशासनाने लक्ष देण्याची गरज : अवजड वाहतुकीमुळे धोका
वार्ताहर / एकसंबा
कल्लोळ येथील कृष्णा नदीवरील अनेक वर्षांपासूनचा बंधारा जीर्ण झाला आहे. तसेच यंदाच्या पुरामुळे बंधाऱयाचा एक पिलर वाहून गेला आहे. यामुळे वाहनधारकांना होणारा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने सदर बंधारा वाहतुकीस बंद करण्यात आला होता. पण गेल्या काही दिवसांपासून बंधाऱयावरून मोठय़ा प्रमाणात वाहतूक होत असल्याने बंधाऱयासही धोका वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
गत 15 वर्षांपूर्वी कल्लोळ-येडूर बंधाऱयावरून अवजड वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. यासाठी बंधाऱयाच्या दोन्ही बाजूस लोखंडी कमानी उभ्या करण्यात आल्या होत्या. लहान वाहनांची ये-जा या बंधाऱयावरून सुरू होती. मात्र 2019 व 2020 या दोन वर्षात आलेल्या पुरामुळे सदर बंधारा आणखीनच धोकादायक बनला होता. यंदाच्या ऑगस्ट महिन्यात पाणलोट क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाला. यामुळे विविध धरणातून मोठय़ा प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला. पाण्याच्या प्रवाहामुळे बंधाऱयाचा एक पिलर वाहून गेला. गेल्या तीन महिन्यांपासून या बंधाऱयावरून वाहतूक तालुका प्रशासनातर्फे बंद करण्यात आली होती.
तरीही काही दुचाकीस्वार धोका पत्करून बंधाऱयावरून ये-जा करीत होते. ही बाब लक्षात घेऊन बंधाऱयाच्या येडूर गावाकडील बाजूस जेसीबीच्या सहाय्याने मोठा खड्डा काढण्यात आला. पण काही दिवसातच दुचाकी जाण्याइतकी सोय स्थानिकांनीच केली. आता तर मोठी वाहनेही जात असल्याने धोका आणखीन वाढला आहे. नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करता या बंधाऱयाची वरचेवर पाहणी होणे आवश्यक आहे. पण प्रशासनाकडून तसे होताना दिसत नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱयांनी पुढील धोक्मयाचे गांभीर्य ओळखून योग्य निर्णय घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
बंधाऱयावरून ऊस वाहतूक रोखा!
कल्लोळ, येडूर परिसरात मोठय़ा प्रमाणात उसाचे क्षेत्र आहे. उसाच्या गळीत हंगामास प्रारंभ झाला आहे. कमी वेळेत कारखान्यास ऊस पाठविण्यासाठी वाहतूकदार जर धोका पत्करून बंधाऱयावरून उसाची वाहतूक केल्यास मोठय़ा संकटाला सामोरे जावे लागणार आहे. तसेच येडूर हे तीर्थक्षेत्र असल्याने बाहेरील जिह्यातून अनेक भाविक येत असतात. स्थानिक नागरिकांद्वारे बंधाऱयावरून होत असलेली ये-जा पाहून दूरवरून आलेल्या प्रवाशांनीही धोका पत्करल्यास मोठी किंमत मोजावी लागेल. यामुळे कोणतीही दुर्दैवी घटना होण्याआधी प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.