सागर पाटील : कळंबा
प्रादेशिक पर्यटन विकास योजना अंतर्गत पालकमंत्री सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रयत्नातून कळंबा तलाव सुशोभीकरण ४ कोटी ५० लक्ष निधी मंजूर झाला असून या निधीच्या सहाय्याने कळंबा तलाव परिसराचे सुशोभीकरण होणार आहे. मिळालेल्या निधीतून अपुऱ्या कामना प्राधान्य देण्याची गरज आहे.
कळंबा सुशोभीकरणाचे काम निम्म्यावर गेल्या चार ते पाच वर्षांपासून अर्धवट असल्याने तलाव सुशोभिकरणाला खो बसला होता. सुशोभीकरणाचे काम पूर्ण झाल्यास तलावाला पर्यटनस्थळाचा दर्जा प्राप्त होणार आहे. तसेच येथील पर्यटनाला चालना मिळणार असून कळंबा गावासह आसपासच्या तरुणांना रोजगाराची संधीही उपलब्ध होणार आहे.
कळंबा तलावाच्या दहा कोटींच्या सुशोभीकरणाच्या कामाअंतर्गत राज्य सरकारच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या १० कोटींच्या कामातून गेल्या चार वर्षापासून निधी मिळाला नसल्याने तलावाचे सुशोभीकरणाचे काम रखडले. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून तलावाच्या सुशोभीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला. काही विकासकामे पूर्णत्वाकडे गेली. तर महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष व ठेकेदाराचे दुर्लक्ष व वेळकाढूपणा यामुळे निकृष्ट बंधारा मजबुती करण, यामुळे मनोऱ्याची दुरुस्ती, सवरक्षण भिंत, स्वच्छता गृह, वाहन तळ पार्किंग व्यवस्था, पक्षी निरीक्षण टॉवर, मिनी कुस्त्यांचे मैदान, सायकल व वॉकिंग ट्रॅक, सौर ऊर्जा पथदिवे, यासह अनेक सुशोभीकरणाची कामे रखडली आहेत.
नव्याने चार कोटीं पन्नास लाखांचा भरगोसअसा निधी मिळाला आहे. यातून कळंबा सुशोभिकारीणसाठी भरीव अशी कामे होणे अपेक्षित आहेत. त्याच बरोबर कामाचे प्राधान्य क्रम ठरवणे आवश्यक आहे जेणे करून पर्यटनाला चालना मिळेल आताच्या चार कोटीं पन्नास लाखांच्या निधीतून या कानामान प्राधान्य देण्याची गरज आहे. चार वर्षांपूर्वी राज्य सरकारच्या निधीतून हाती घेण्यात आलेल्या १० कोटींच्या कामातून नव्याने दगडी पिचिंग करण्यात आले, तेही अवघ्या काही महिन्यांतच ते कोसळले. बंधाऱ्याला पाण्याच्या बाजूने दिलेला दगडाचा अस्तर पूर्णत: खचला आहे. त्यामुळे ठेकेदाराने केलेल्या कामाचा दर्जा संशयाच्या भोवऱ्यात सापडला होता.
तलावातील जलस्रोत जिवंत करणे गरजेचे
वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. यामुळे एप्रिल-मे दरम्यान कोल्हापूरकरांना अनेकदा प्रचंड पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. लोकराजा राजर्षी शाहू महाराजांनी दूरदृष्टीने बांधलेल्या राधानगरी धरणाने कोल्हापूरकरांच्या पाण्याचा मोठा प्रश्न मार्गी लागला आहे . पण कळंबा तलाव तितकाच कोल्हापूर कारन महत्वाचं असलेने ते महापुराच्या काळात अधोरेखित झाले आहे. कोल्हापूरच्या जुन्या जलस्रोतांचे जतन, संवर्धन व संरक्षण केल्यास भविष्यातील पाण्याची मोठी व्यवस्था होऊ शकते. शिवाय कात्यानी येथून जयंती नदी नाले, ओढे, नैसर्गिक जलस्रोत आजही जिवंत आहेत.
कळंबा तलाव हा 140 वर्षांपूर्वी म्हणजे १ जुलै १८८३ रोजी बांधून पूर्ण करण्यात आला. त्यामुळे सध्या असणार बंधारा पाण्याचा भार पेलण्याकरिता किती सक्षम व मजबूत आहे याचे तज्ज्ञ अभियंत्यांमार्फत तांत्रिक लेखापरीक्षण होणे अत्यावश्यक असून, त्यानुसार त्याची देखभाल-दुरुस्ती होणे गरजेचे आहे. सध्यातरी तलावाचा बंधारा निमुळता होत असून, खचलेला आणि भविष्यकाळातील धोक्याचा इशारा देत आहे.