रेल्वेमंत्र्यांच्या उपस्थितीत नव्या प्रणालीची यशस्वी चाचणी : 160 च्या वेगानंतरही गाडय़ांची धडक टळली
सिकंदराबाद / वृत्तसंस्था
भारतीय रेल्वेसाठी शुक्रवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. दोन रेल्वेंमध्ये समोरासमोर होणारी धडक टाळण्यासाठी ‘कवच’ सुरक्षा यंत्रणेची अनोखी चाचणी यशस्वीपणे पूर्ण करण्यात आली. स्वदेशी टेन टक्कर सुरक्षा प्रणाली कवचची सिकंदराबादमध्ये चाचणी करण्यात आली. या चाचणीदरम्यान दोन गाडय़ा विरुद्ध दिशेने पूर्ण वेगाने एकमेकांकडे धावल्या. या चाचणी दरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव स्वतः एका रेल्वेत उपस्थित होते. रेल्वेमंत्र्यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. शून्य अपघाताचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी स्वदेशी बनावटीचे हे ऑटोमेटेड टेन प्रोटेक्शन (एटीपी) तंत्रज्ञान विकसित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने एखादी टेन आपोआप थांबवण्यासाठी मदत होईल.
स्वदेशी विकसित टेन कोलिजन प्रोटेक्शन सिस्टम ‘कवच’ची शुक्रवारी सिकंदराबाद येथे चाचणी घेण्यात आली. ‘कवच’ने दोन्ही रेल्वेगाडय़ांना काही मीटर अंतरावर एकमेकांशी टक्कर होण्यापासून रोखले. यादरम्यान रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव एका टेनमध्ये तर रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष दुसऱया टेनमध्ये बसले होते. ‘कवच’ सिस्टीमच्या आधारे एकमेकांसमोर येणाऱया रेल्वे 380 मीटर अंतरावर थांबल्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली.
तेलंगणातील सनथनगर-शंकरपल्ली सेक्शनवर सिकंदराबाद येथे रेल्वेगाडय़ांमधील ‘कवच’ची चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा एक मिनिटाचा व्हिडिओ खुद्द रेल्वेमंत्र्यांनी शेअर केला आहे. यामध्ये रेल्वेमंत्री वैष्णव आणि इतर रेल्वे अधिकारी इंजिनच्या केबिनमध्ये दिसत आहेत. वैष्णव यांनी ट्विट केले की, ‘रिअर-एंड टक्कर चाचणी यशस्वी झाली आहे. पलीकडून येणाऱया लोकोपासून 380 मीटर अंतरावर कवचने आपोआप आमचा लोको थांबवला’ असे ट्विट केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केले आहे.
‘कवच’द्वारे अशी टळेल दुर्घटना…
जेव्हा टेनला सिग्नल दिला जातो, तेव्हा त्या टेनला पुढे जाण्याची परवानगी नसते, तेव्हा या तंत्रज्ञानाद्वारे धोक्मयाचा सिग्नल पाठविला जातो. यावेळी लोको पायलट टेन थांबवण्यात अयशस्वी ठरला, तर ‘कवच’ तंत्रज्ञानाद्वारे टेनचे ब्रेक आपोआप लागू शकतात आणि टेनला कोणत्याही मोठय़ा अपघातापासून वाचवता येते. हे तंत्रज्ञान हाय फ्रिक्वेन्सी रेडिओ कम्युनिकेशनवर काम करते. यासोबतच ते ‘सिस्टम इंटिग्रिटी लेव्हल-4’शी सुसंगत असून ते सुरक्षा प्रमाणपत्राचे सर्वोच्च मानले जाते.
प्रतिकिलोमीटर 50 लाख रुपये खर्च
जेव्हा डिजिटल सिस्टीमला रेड सिग्नल, इतर कोणतीही चूक किंवा मॅन्युअल एरर आढळते तेव्हा टेनही आपोआप थांबतात. हे तंत्रज्ञान कार्यान्वित झाल्यानंतर यासाठी प्रतिकिलोमीटर 50 लाख रुपये खर्च येईल, तर जगभरात अशा तंत्रज्ञानासाठी सुमारे 2 कोटी रुपये खर्च केले जातात, असे रेल्वेच्या वरि÷ अधिकाऱयांनी सांगितले.
अर्थसंकल्पात घोषणा
2022 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात या तंत्रज्ञानाबाबत घोषणा करण्यात आली होती. ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानांतर्गत दोन हजार किलोमीटर रेल्वेचे जाळे ‘कवच’ तंत्रज्ञानाखाली आणले जाणार आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये 1,098 किलोमीटरहून अधिक मार्गावर आणि 65 लोकोमोटिव्हवर ‘कवच’ बसवण्यात आले आहे. याशिवाय दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा कॉरिडॉरवर ‘कवच’ तंत्रज्ञान कार्यान्वित करण्याची योजना असून हा मार्ग सुमारे 3,000 किमीचा आहे.