सुशांत कुरंगी / बेळगाव
रामायणात सेतू बांधण्यासाठी श्रीरामांना आपल्यापरीने मदत करणारी खारूताई अजरामर झाली. जंगलाला आग लागल्यानंतर आपल्या चोचीने पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न करणारी चिमणी गोष्टीरूपाने आपल्या स्मरणात राहिली. त्यामुळेच संकटकाळात आपला किंचीतसा तरीही लाखमोलाचा सहभाग देणारी मंडळी ‘खारीचा वाटा’ उचलतात आणि दीर्घकाळ स्मरणात राहतात. अशीच कामगिरी बेळगावच्या एका मास्क विक्री करणाऱया सर्वसामान्य नागरिकाने केली आहे.
सध्याच्या कोरोनापर्वात सर्वत्र मदतकार्याचे उधाण आले आहे. छोटीशी मदत देऊन भलीमोठी प्रसिद्धी मिळविण्यासाठी बरेच महाभाग सरसावले आहेत. मात्र आपल्या कष्टाच्या मेहनतीमधील एक घास दुसऱयांना देऊन मदतीची खरी भावना प्रकट करणारी मंडळी विरळच असतात. अशा विरळ व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे कंग्राळ गल्ली येथील मारुती शिवराम चव्हाण. किरकोळ विक्री करून गुजराण करणाऱया मारुती यांनी मास्क विक्री करत 500 रुपयांचा धनादेश प्रधानमंत्री साहाय्यता निधीला पाठवून आपला खारीचा वाटा उचलला आहे.
दररोज सकाळी 6 पासून रूमाल, मास्क विक्री करीत असतात. वर्षभर रामदेव गल्ली येथील एका छोटय़ाशा जागेत रूमाल व इतर साहित्याची विक्री करतात. घरची परिस्थिती बेताचीच आहे. यापूर्वी सरदार्स मैदानाशेजारी असणारे मारुती आता कंग्राळ गल्ली येथे राहण्यास आहेत. दोन्ही मुले कामाला असून पत्नीही संसाराला हातभार लावत असते. प्रामाणिकपणे काम करणाऱया काकांची ओळख ही वेगळीच आहे.
भाडय़ाच्या खोलीत राहून वाढविला संसार
कंग्राळ गल्ली येथील एका लहानशा खोलीत मारुती चक्हाण राहतात. पत्नी व दोन मुलगे असा त्यांचा परिवार. कधीही मोठय़ा अपेक्षा न ठेवता कष्टाने आयुष्याशी दोन हात करत त्यांनी भाडय़ाच्या घरात आपला संसार फुलविला आहे. लॉकडाऊन असल्यामुळे सर्वांनीच घरी राहण्यापेक्षा आपण मास्क विक्री करण्याचा निर्णय घेतला. खडेबाजार, रामदेव गल्ली येथे सध्या ते मास्कची विक्री करीत आहेत.
बँकेत कर्मचाऱयांनी दिली माहिती
कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे तो थोपविण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च येत आहे. त्यामुळे सरकारचे हात मजबूत करण्यासाठी नागरिकांनीच पुढे येण्याचे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. त्यामुळे बँकेत येणाऱया प्रत्येक ग्राहकाला तुम्हाला शक्मय तितकी रक्कम पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री साहाय्यता निधीला देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मारुती चव्हाण हे बँकेमध्ये गेले असता त्यांनाही ही माहिती देण्यात आली, आणि कोरोनाच्या या लढय़ासाठी त्यांनीही मदत जमा केली.
देशाला मदतीची गरज
ज्या देशात आपण जन्माला आलो, वाढलो, ज्याने आपल्याला पैसा, प्रति÷ा मिळवून दिली, त्या देशाला आता आपली गरज आहे. रतन टाटांसारखा उद्योगपती करोडो रुपयांची मदत देशाला करतो. तेव्हा माझ्यासारख्या लहान विपेत्याने 500 रुपये मदत करणे हे मोठे नाही. मी काही मोठी मदत केली नाही, परंतु माझ्याकडून जितके शक्मय होते तितके करण्याचा मी प्रयत्न केला, असे प्रामाणिक मत मारुती काकांनी व्यक्त केले.
दररोज 300 रुपये मिळविणाऱया मारुती काकांनी पंतप्रधान साहाय्यता निधीला मदत देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे. आज अनेकांजवळ भरपूर पैसा आहे, पण त्यांच्याकडे देण्याची वृत्ती नाही. शेवटी चोचीने पाणी आणून आग विझविणाऱया चिमणीचीच इतिहासालाही नोंद घ्यावी लागली. त्यामुळे आपापल्यापरीने देशाला मदत करणे गरजेचे आहे.