वार्ताहर / कसबा सांगाव
विषारी घटक असलेल्या खुटवडा वेल खाल्याने विषबाधा होऊन कागल तालुक्यातील कसबा सांगाव येथे आठ शेंळ्याचा मृत्यु झाला.
कसबा सांगाव ते कागल मगदुम मळा या रोडवरती या परिसरात शेंळ्या चरण्यासाठी आणल्या होत्या. येथे शेळ्यानी खुटवडा वेल खाल्याने त्यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर काही वेळातच आठ शेळ्या मृत्युमुखी पडल्या. सिध्दू हरिबा हजारे, अजित विठू हजारे या मेंढपाळ यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.मृत शेळ्याचे शवविच्छेदन केले.
तालुका पशु वैद्यकिय अधिकारी डॉ. दिपक घनवट पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय पाठक, परिचर बदाम लोहार, तलाठी दिगंबर पाटील, कोतवाल संजय कोतवाल यांनी पंचनामा केला.