वृत्तसंस्था/ लंडन
अलिकडच्या काही कालावधीत कसोटी क्रिकेटमधील सामना पाचऐवजी चार दिवसांचा खेळवावा असे मत व्यक्त करण्यात आले होते. आयसीसीकडून हा प्रस्ताव ठेवण्यात आला होता आणि विविध क्रिकेट प्रशासकीय व्यक्तींकडून वैयक्तिक मते मागविण्यात आली होती दरम्यान, कसोटी सामना पाच दिवसांचा रहावा, असे मत एमसीसीतर्फे व्यक्त करण्यात आले आहे.
येत्या मार्चमध्ये होणाऱया आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर चर्चा केली जाणार आहे. आयसीसीच्या या नव्या प्रस्तावाला मोठय़ा प्रमाणात विरोध होत आहे. जागतिक दर्जाची क्रिकेटपटू विराट कोहली, सचिन तेंडुलकर, रवि शास्त्राr, रिकी पाँटींग, इयान बोथम, स्टीव्ह वॉ आणि सेहवाग यांनी या प्रस्तावाला विरोध केला आहे. आयसीसीच्या क्रिकेट समितीचे नेतृत्व अनिल कुंबळेकडे असून त्या समितीत लंकेचा महेला जयवर्धने आणि प्रशिक्षक मिकी आर्थर यांचा समावेश आहे. कसोटी सामना चार दिवसांचा ठेवावा यासाठी इंग्लंडचा माजी कर्णधार मायकेल वॉन आणि ऑस्ट्रेलियाचा शेन वॉर्न यांनी आपला वैयक्तिक पाठिंबा दर्शविला आहे.