ऑनलाईन टीम/तरुण भारत
पाच राज्यांत झालेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी उफाळून आली आहे. काँग्रेसचा एक गट गांधी घराण्यावर टीका करत आहे. दरम्यान, पंजाबसारखं राज्यही ‘आप’नं काँग्रेसच्या हातून काढून घेतलं असून गोव्यातही अपेक्षित कामगिरी करता आली नाही. त्यामुळं आता काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी या पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा राजीनामा मागितला होता. आता तर सोनिया यांनी 5 राज्यांतील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्यासाठी आणि निवडणूक पराभवानंतर संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी ५ वरिष्ठ नेत्यांची कमिटी नियुक्त केली आहे.
दरम्यान, सोनिया गांधी यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीच्या पराभवानंतर परिस्थितीचे आकलन करण्यासाठी पाच वरिष्ठ नेत्यांची नियुक्ती केली आहे. तसेच निवडणुकीतील पराभवाच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बदल करण्याचे सुचवले आहेत. यामध्ये खासदार आणि आमदारांचा देखील समावेश आहे. यामध्ये जयराम रमेश यांच्याकडं मणिपूर, अजय माकन यांना पंजाबमधील परिस्थितीचं आकलन करण्याचं काम सोपवण्यात आलंय. तर, राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना गोव्यातील परिस्थितीचं आकलन करण्यास सांगितलंय. तसेच काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं मूल्यांकन करतील आणि बदल सुचवतील, तर अविनाश पांडे यांना उत्तराखंडमध्ये असंच काम करण्यास सांगितलंय.
राज्यसभा खासदार रजनी पाटील यांना गोव्यातील आणि जयराम रमेश यांना मणिपूरमधील परिस्थितीचे आकलन करण्यास सांगितले आहे. यावेळी, मुल्यांकनाची जबाबदारी अजय माकन यांच्यावर सोपवण्यात आली आहे. जिथे काँग्रेसचा आम आदमी पक्षाकडून पराभव झाला होता. काँग्रेस नेते जितेंद्र सिंह उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचं आकलन करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर अविनाश पांडे यांना उत्तराखंडमध्ये अशाच प्रकारचं काम करण्यास सांगितलं आहे.
काँग्रेस अध्यक्षांनी निवडणुकीनंतरच्या परिस्थितीचे मूल्यांकन करण्यासाठी आमदार-उमेदवार आणि प्रमुख नेत्यांकडून मिळालेल्या इनपुटच्या आधारे राज्यांमध्ये संघटनात्मक बदल सुचवण्यासाठी नेत्यांची नियुक्ती केली आहे, असे अधिकृत नोटीसमध्ये म्हटले आहे.
.