बेंगळूर/प्रतिनिधी
कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि कन्नड साहित्यिक वीरप्पा मोईली यांच्यासह २० साहित्यिकांना साहित्य अकादमी पुरस्कार २०२० देण्याची घोषणा करण्यात आली आहे. मोईलींच्या कन्नड महाकाव्य ‘श्री बाहुबली अहिंसा दिग्विजयम्’ यासाठी त्यांना हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल.
अकादमीतर्फे सात काव्यसंग्रह, चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह, दोन नाटक, एक संस्मरण आणि एक महाकाव्य साठी साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
साहित्य पुरस्कार अकादमीचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर कंबर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अकादमीच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत या पुरस्कारांची शिफारस २० भारतीय भाषेच्या न्यायाधीश समित्यांनी केली होती.
अरुंधती सुब्रमण्यम (इंग्रजी), हरीश मीनाश्रू (गुजराती), अनामिका (हिंदी), आर.एस. भास्कर (कोंकणी), युरुंगम देवेन (मणिपुरी), रूपचंद हंसदा (संताली) आणि निखिलेश्वर (तेलगू). नंदा खरे (मराठी), डॉ. महेशचंद्र शर्मा गौतम (संस्कृत), इम्य्याम (तमी) आणि हुसेन-उल-हक यांना चार कादंबर्यांची पुरस्कार देण्यात येणार आहे. पारितोषिक विजेत्यांना एका विशेष सोहळ्यात बक्षीस म्हणून कोरलेली ताम्रफलक, शाल आणि एक लाख रुपयांची रक्कम देण्यात येणार आहे.