वेंगुर्ले / वार्ताहर:
देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत काँग्रेसच होती. या देशाला काँग्रेसने स्वातंत्र्य मिळवून दिले आणि स्वातंत्र्यानंतर राष्ट्र निर्माणाचे काम सुध्दा काँग्रेसने केले. 2014 पर्यंत देशाला महासत्तेच्या उंबरठयावर आणुन ठेवण्याचे काम केंद्रात बराच काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसच्या सरकारने केले. आता सत्तेत असलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार गुण्यागोविंदाने नांदणाऱ्या जनतेत फुट पाडून अराजकता माजवू पाहतेय. स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी धर्माधर्मात भांडणे लावत आहेत. त्यामुळे हा देश वाचवायचा असेल तर काँग्रेस पक्षा शिवाय पर्याय नाही हे जनतेला कळून चुकले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात सर्व निवडणुकामध्ये काँग्रेस उभारी घेताना आपल्याला दिसेल. असे प्रतिपादन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे यांनी शिरोडा येथ आयोजीत अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी केले. 15 ऑगस्ट 2021 रोजी देशाच्या स्वातंत्र्याला 74 वर्षे पूर्ण होऊन आपण 75 व्या वर्षात पदार्पण करीत आहोत. देशाच्या स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासात काँग्रेस हा अविभाज्य घटक आहे. हा इतिहास नव्या पिढीसमोर आणण्यासाठी तरूणांमध्ये राष्ट्रीयlवाची भावना जागृत व्हावी, स्वातंत्र्य चळवळीचा खरा इतिहास लोकांसमोर यावा.
स्वातंत्र्य लढयातील काँग्रेसचा सहभाग अधोरेखित व्हावा. या उद्देशाने `व्यर्थ न हो बलिदान’ अभियान सुरू करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट 2021 रोजी वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा येथे महात्मा गांधी यांच्या आदेशानुसार मिठाचा सत्याग्रह ज्या ठिकाणी झाला होता, त्याच ठिकाणी स्वातंत्र्य लढयाच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख यांनी स्वातंत्र्य लढयातील व स्वातंत्र्यानंतरच्या राष्ट्र उभारणीतील काँग्रेसचे योगदान यावर सविस्तर माहिती दिली. तसेच महात्मा गांधीच्या मिठाचा सत्याग्रह हि स्वातंत्र्या लढयाची फार मोठी चळवळ कशी उभी राहिली याचे विवेचन केले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरू, लालबहाद्दूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांनी आपल्या कुशल नेतृत्वाखाली या देशाची प्रगती कशी केली. इंग्रजांनी आपल्या देशाला लुटून भिकारी केला होता. ज्या देशात 1947 मध्ये सुईचे सुध्दा उत्पादन होत नव्हते, त्या देशात अणू बॉम्ब सुध्दा बनवला. देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविले.
जगातील प्रगत देशांबरोबर अनेक बाबतीत स्पर्धा करणारा देश निर्माण केला. यावेळी चंद्रकांत ऊर्फ बाळा गावडे, जिल्हा उपाध्यक्ष व प्रवक्त्ता इर्शाद शेख, प्रांतिक सदस्य दादा परब, जिल्हा सरचिटणीस प्रकाश जैतापकर, चंद्रशेखर जोशी, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष विधाता सावंत, वेंगुर्ले पंचायत समिती उपसभापती सिध्देश परब, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष जगन्नाथ डोंगरे, मालवण तालुका अध्यक्ष मेघनाथ धुरी, सावंतवाडी तालुका अध्यक्ष महेंद्र सांगेलकर, नगरसेविका कृतिका कुबल, स्नेहल खोबरेकर, अभय शिरसाट, एन्. एस. यु. आय. जिल्हाध्यक्ष कौस्तुभ गावडे, अरविंद मोंडकर, समीर वंजारी, विजय खाडे, सचिदानंद बुगडे, पांडुरंग नाटेकर, राघवेंद्र नार्वेकर, मंदार शिरसाट,योगेश्वर कुर्ले, कुडाळ महिला अध्यक्षा सुंदरवल्ली पडायची, सावंतवाडी महिला अध्यक्षा स्मिता वागळे, अमिदी मेस्त्री, जस्मीन लक्षमेश्वर, उत्तम चव्हाण, मयूर आरोलकर, किरण तांडेल, माया चिटणीस, रावजी परब, नितीन परब, सखाराम परब, प्रशांत परब, शांताराम मसूरकर, दिगंबर परब, विशाल गावडे, उत्तम शेटये, हायजीन फिलिप, जोसेफ डिसोझा, योगेश परब, विठ्ठल परब, यश परब, सुमीत राऊत, प्रणय मेस्त्री, अमृता मोंडकर, सुनिता राऊत, फिजा मकानदार, दिनेश गावडे, चिन्मय बांदेकर, महेश परब, रमाकांत परब, शशिकांत परब, गोविंद कुंभार, रुपेश आईर, आनंद कुंभार, अमित कुंभार, दिपाली राऊत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.