ऑनलाईन टीम / पुणे :
काँग्रेस शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं आहे, असा आरोप भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
ते म्हणाले, काँग्रेसने योग्य प्लॅन करुन शिवसेनेला हिंदुत्त्वापासून दूर नेलं. मी शिवसेनेचा हितचिंतक आहे. ते होते म्हणून मराठी माणूस, हिंदू माणूस वाचला. काँग्रेस तुम्हाला हिंदुत्वापासून दूर नेत आहे. त्याच्या बदल्यात मनसेला जागा करून दिली जात आहे.
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका मुलाखतीत भाजपाने विश्वासघात केल्याचे म्हटले होते. त्याबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले, कोणी कोणाचा विश्वासघात केला. हे जनता ठरवेल ठरवेल. तसेच राज्यात नोव्हेंबर – डिसेंबरमध्ये पुन्हा निवडणूका झाल्यास कोणी कोणाचा विश्वासघात केला हे स्पष्ट होईल.