राजस्थानच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेस पक्षश्रे÷ाrंचाच जीव भांडय़ात पाडला आहे. प्रियंका गांधी यांच्या मध्यस्थीने सचिन पायलट यांचे बंड काही महिन्यांपूर्वी शमविण्यात काँग्रेसला यश आले होते. आक्रमक आणि संपूर्ण राज्यावर आपले वर्चस्व राखून असलेले अशोक गहलोत एकीकडे आणि युवा काँग्रेस नेतृत्वाच्या वयाचे असलेले सचिन पायलट एकीकडे अशी पक्षाची स्थिती झाली होती. अर्थात हे फक्त राजस्थानमध्ये घडले असे नव्हे. लोकसभा निवडणुकीच्यावेळी राहुल गांधी यांनी पक्षातील ज्ये÷ नेतृत्वाला थेट अंगावर घेतले होते आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत असणाऱया युवा नेत्यांनासुद्धा आता आपले दिवस सुरू झाले असे वाटू लागले होते. काँग्रेसच्या संस्कृतीप्रमाणे राष्ट्रीय नेतृत्वाला भक्कम करण्यासाठी प्रत्येक राज्यात दोन प्रबळ गट निर्माण करायचे आणि मुख्यमंत्र्यांविरोधात शक्ती उभी करायची म्हणजे सत्तेचा समतोल राखता येतो आणि प्रादेशिक महत्त्व प्राप्त झालेल्या नेत्यावर अंकुश ठेवता येतो ही काँग्रेसच्या राजकारणाची जुनी रीत आहे. तरी तिला अनुसरून राहुल गांधी यांनी पक्षात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रदीर्घ काळापासून प्रयत्न चालवला आहे. मात्र त्याचवेळी पक्षातील जुनेजाणते नेतृत्व ज्यांनी वाईट काळामध्ये सुद्धा पक्षाची बूज आपापल्या राज्यात राखण्याचा प्रयत्न केला आहे, ते राष्ट्रीय नेतृत्वाला सहजासहजी आपल्यावर इतर कोणालाही लादू देण्यास तयार नाहीत. त्याचाच परिणाम राज्याराज्यांमध्ये प्रादेशिक महत्त्व असणारे नेतृत्व विरुद्ध काँग्रेसचे युवा नेतृत्व अशी दुफळी माजलेली दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी काँग्रेसमधली ही दुफळी पुरती समजून घेतलेली आहे. एकीकडे जुनेजाणते काँग्रेस नेते आणि दुसऱया बाजूला राहुल गांधी अशी स्थिती झाल्याने आणि लोकसभेतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी तडकाफडकी पक्षाध्यक्षपद सोडल्याने पक्षात त्यांचे पाठीराखे युवा नेते अधांतरी झाले होते. मोदी सरकारच्या पहिल्या कारकिर्दीमध्ये संसदेचे कामकाज सुरू असतानासुद्धा राहुल गांधी त्यात सामील होत नाहीत अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारखे युवानेते भाजपला खुलेपणाने अंगावर घेऊन आव्हान देताना दिसत होते. ज्ये÷ नेत्यांपैकी काही मंडळींनी एकतर भाजपमध्ये प्रवेश करणे पसंत केले किंवा जे होते ते पाहत आपला कुलदीपक कसा पुढे जाईल किंवा आपले आव्हान कसे टिकून राहील, तेवढीच तजवीज करून घेऊन हातचे राखून परिस्थिती पाहणे पसंत केले होते. त्याचा परिणाम पक्षाला मोठय़ा प्रमाणावर जाणवत होता आणि त्याचवेळी राहुल गांधी यांचे पर्यटनसुद्धा चर्चेचा विषय ठरत होते. या काळात मध्यप्रदेश, कर्नाटक आणि राजस्थान सारख्या राज्यांमध्ये काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान देण्याची स्थिती होती. कर्नाटकात सिद्धरामय्या विरुद्ध येडियुराप्पा अशी लढाई न होता मोदी विरुद्ध सिद्धरामय्या अशी लढाई झाली. हीच परिस्थिती कमलनाथ मोदी अशी मध्य प्रदेशात तर अशोक गहलोत विरुद्ध मोदी अशी राजस्थानात झाली. भाजपने आपले सक्षम नेतृत्व राज्यात उभे केले तरीसुद्धा मोदींचा चेहरा पुढे करूनच निवडणुका लढवल्या. मात्र गोवा, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये काँग्रेसने भाजपला आपले अस्तित्व फार चांगल्या पद्धतीने दाखवून दिले. अर्थातच हे यश काँग्रेसच्या प्रादेशिक नेतृत्वाचे होते. पण त्यात युवा नेतृत्वाला यश मिळूनही तितकेसे महत्त्व देण्यात आले नाही. सोनिया गांधी यांना याची जाणीव असली तरी राहुल गांधी यांच्या काही चुकापैकी ज्ये÷ नेत्यांना विचारात न घेणे ही चूक महागात पडत गेली. परिणामी नेतृत्वाने कोणत्याच बाजूने आपले मत टाकल्याचे दिसून आले नाही. पुढे राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्षपद सोडल्यानंतर पक्षाचे अस्तित्व राखण्यासाठी सोनिया गांधी यांनाच हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडावी लागली. आहेत त्यांच्यावरच विश्वास ठेवत नेतृत्व आणि काँग्रेसचे आव्हान कायम ठेवले. ममता बॅनर्जी, शरद पवार अशा नेत्यांनीही राहुल गांधी यांच्यापेक्षा सोनिया गांधी यांच्या शब्दाला महत्त्व देऊन अद्याप राहुल गांधी यांना तितकी विश्वासार्हता मिळाली नसल्याचे अलीकडच्या काळात दाखवून दिले आहे. एका बाजूला स्वतःचे आव्हान निर्माण करू पाहणारे राहुल गांधी हे मोदी आणि भाजप विरोधात लढत आहेत तर दुसऱया बाजूला त्यांची लढाई काँग्रेसच्या वरि÷ नेत्याबरोबरही सुरू आहे. याच लढाईमुळे ज्योतिरादित्य शिंदे यांना पक्ष सोडावा लागला. भाजपने तेथे सत्तांतर घडवले. मात्र शिवराजसिंह चव्हाण यांना मुख्यमंत्री करून शिंदे यांना नागरी उड्डाण मंत्रीपद देऊन बोळवण केली. मुख्यमंत्रीपद नाही किमान पित्याला मिळालेले पद आपल्याला मिळाले या समाधानात सध्या शिंदे महाराज दिल्लीत सुखाने नांदत असल्याचे दाखवत आहेत. नेमकी हीच चूक पुन्हा राजस्थानात होऊ नये म्हणून प्रियंका गांधी यांनी मध्यस्थी करून सचिन पायलट यांना रोखले. अर्थात अनुभवी गहलोत यांनी सचिन यांचे आव्हान पुरते संपुष्टात आणून त्यांचे पाठीराखेसुद्धा आपण फोडू शकतो असे दाखवून दिले होते. पक्ष निरीक्षकांनासुद्धा पायलट यांची बाजू घेणे अवघड झाले होते. मात्र ऐनवेळी झालेल्या तडजोडीमुळे सचिन पायलट पक्षात थांबले आणि आता मंत्रिमंडळ विस्तारात त्यांच्या अनुयायांना स्थान मिळाले. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांनी पंधरा मंत्र्यांना घेऊन आपले आसन बळकट करताना एक युवा नेताही पक्षात राखला आहे. युवा मतदारांची संख्या वाढत असताना आज देशातील अनेक राज्यांचे मुख्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री हे जे÷त्वाकडे झुकलेले आहेत. अर्थात भाजपमध्ये मोदी यांचे एक खांबी नेतृत्व असल्याने त्यांना आव्हान देण्याची ताकद ज्येष्ठत आहे ना कनिष्ठमध्ये. त्यामुळे याबाबतीतली भाजपमधील खदखद नजीकच्या काळात कधीच उफाळून आलेली पाहता येणार नाही. मात्र काँग्रेसमध्ये ज्येष्ठ नेते आणि तरुण काँग्रेस नेत्यांमध्ये असणारा नेतृत्वाचा गोंधळ संपत नसल्याने हे वाद सातत्याने दिसून येत आहेत. आपली कृती पक्ष वाचवत आहे अशा आविर्भावात ज्ये÷ काँग्रेस नेत्यांनी पक्षाला कात्रीत पकडण्याचा केलेला प्रयत्न अजून देश विसरलेला नाही. मात्र तशाही परिस्थितीत अशोक गहलोत यांनी आपल्या राज्यातील युवा नेत्याला जपून एका अर्थाने काँग्रेसलाच दिलासा दिलेला आहे.
Previous Articleशाहिदच्या ‘जर्सी’चे पहिले पोस्टर
Next Article बांगला टायगर्सचा वॉरियर्सवर 5 गडय़ांनी विजय
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.