नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भाजपला विरोध करण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँगेसला वगळून अन्य पक्षांची आघाडी करण्याचा प्रयत्न चालविला आहे. तथापि, काँगेसशिवाय संयुक्त पुरोगामी आघाडी म्हणजे आत्म्याविना शरीर अशा शब्दांमध्ये काँगेस नेते कपिल सिबल यांनी या प्रयत्नाची खिल्ली उडविली आहे. काँगेसचे प्रवक्ते आनंद शर्मा यांनीही या प्रयत्नावर कठोर टीका केली.
बुधवारी बॅनर्जी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी काँग्रेसच्या नेतृत्वावर कठोर शब्दांमध्ये अप्रत्यक्ष टीका केली होती. काँगेसचे विद्यमान नेतृत्व काम करत नाही, असा आरोप त्यांनी केला होता. तसेच आता संयुक्त पुरोगामी आघाडी (युपीए) अस्तित्वातच नाही असे विधानही केले होते. त्यामुळे काँगेसच्या अनेक नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.