काँग्रेससमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले असताना अहमद पटेल यांच्यासारखा मॅनेजर गेल्याने गांधी घराण्यापुढे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे.
गेली पंधरा वर्षे काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींचे राजकीय सचिव राहिलेल्या अहमद पटेल यांच्या निधनाने अगोदरच अडगळीत जात असलेल्या या पक्षाची स्थिती अक्षरश: दुष्काळात तेरावा महिना अशी झाली आहे. पटेल यांच्या जाण्याने काँग्रेसमधील सोनिया युग संपुष्टात आले आहे हे एका जाणकाराचे भाष्य तंतोतंत खरे आहे. प्रकाशझोतापासून अतिशय दूर राहून सोनियांच्या नावाने अहमदभाई पक्ष चालवायचे. जेव्हा पक्ष केंद्रात सत्तेत होता तेव्हादेखील सरकारमधील त्यांचे वजन किती जबर होते हे सामान्य पक्षकार्यकर्त्याला केव्हाच कळले होते. केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद भूषवणारे नेतेदेखील अहमदभाईनी अपॉइंटमेंट दिल्याशिवाय त्यांना भेटू शकायचे नाहीत. विलिंग्डन पेसेंटमधील त्यांच्या बंगल्याचे दार नेहमी बंद असायचे. काँग्रेस सत्तेत असताना अहमदभाईंचा हा बंगला रात्री जिवंत व्हायचा. केंद्रातील वजनदार मंत्री असोत अथवा मुख्यमंत्री. कोणत्याही मोठय़ा निर्णयापूर्वी त्यांना अहमदभाईंसमोर हजेरी द्यावी लागे असे बोलले जायचे. काँग्रेसच्या सरचिटणीस मंडळीना अहमदभाईंचा फोन येऊन गेल्याशिवाय झोपायला बंदी होती असे म्हटले जायचे. तात्पर्य काय तर सरकार असो वा संघटना, भाईंचा शब्द अंतिम मानला जायचा. भाईंच्या रूपाने काँग्रेस अध्यक्षच बोलायच्या.
अहमदभाईंची ऑपरेशन्स ही न बोलता व्हायची. एवढी सत्ता राबवत असताना अहमदभाई हे पक्षाचे फंड कलेक्टर झाले नसते तरच नवल होते. अंबानी असोत की अदानी, टाटा असोत की बिर्ला. झाडून सगळे अहमदभाईंच्या सेवेला तत्पर असायचे. आता अहमदभाईंची जागा कोण घेऊ शकतो याचा कसोशीने शोध सुरू झाला आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची कमतरता नाही. पण अहमदभाईंच्या रोलमध्ये कोण फिट बसू शकतो याबाबत उलटसुलट विचार पक्षात आहेत. सुशीलकुमार शिंदे, मल्लिकार्जुन खर्गे, अशोक गेहलोत, मुकुल वासनिक यांच्यासारखे नि÷ावंत आहेत तसेच दिग्विजयसिंग, कमलनाथ यांच्यासारखे ‘चलता पूर्झा’ आहेत. काल परवापर्यंत गांधी घराण्याच्या जवळचे असलेले पण सध्या बंडाचा झेंडा हातात घेतलेले गुलाम नबी आझाद आहेत. राहुल गांधी यांच्या जवळचे के सी वेणुगोपाल आणि राजीव सातव आहेत तर कधीकाळी त्यांच्या जवळचे असलेले मिलिंद देवरादेखील आहेत. देवरा यांचा एक पाय सध्या भाजपमध्ये आहे अशी कुजबुज पक्षात सुरू असल्याने त्यांचा पत्ता अलगद कटला गेल्याचे दिसत आहे. शिंदे यांच्यासारखे जुनेजाणते नेते हे सोनियांच्या खास जवळचे समजले जात असले तरी सध्या त्यांचे वय 79 आहे, खरगे 78 चे आहेत, कमलनाथ हे 74 चे तर दिग्विजय 73 चे. 69 वर्षाचे गेहलोत हे राजस्थानचे मुख्यमंत्री असल्याने ते काम सोडून त्यांना दिल्लीला येणे जड जाणार कारण त्यांचा जीव खुर्चीत अडकलेला आहे. त्यांना आपला मुलगा वैभवला राजकारणात सेट करायचे आहे. गेहलोत हे सध्या तरी उजवे दिसत आहेत. त्यांना राजस्थानवर त्यांच्या माणसाचा कब्जा ठेवण्याचे आश्वासन दिले तर ते दिल्लीला येऊ शकतात. जे÷ नेत्यात सर्वात कनि÷ असलेले मुकुल वासनिक यांनी देखील साठी पार केली आहे. अहमदभाईंच्या आशीर्वादामुळे वासनिक यांचे काँग्रेसमध्ये बस्तान बसले. ते अहमदभाईंप्रमाणे अतिशय मितभाषी आणि मागे राहून गुपचुप काम करणारे म्हणून जाणले जातात. पक्षात ज्ये÷ प्रवक्ते म्हणून ते 3-4 वर्षे होते पण या संपूर्ण काळात त्यांनी फक्त एकदा मीडिया बरोबर वार्तालाप केला होता. सचिन पायलट यांनी केलेले बंड फसल्यानंतर त्यांचे पक्षात जबर अवमूल्यन झाले आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे औद्योगिक वर्तुळात चांगले वजन असले तरी ते माणूसघाणे म्हणून कुप्रसिद्ध आहेत. सर्वोच न्यायालयात जे÷ वकील असलेले चिदंबरम हे सामान्य कार्यकर्त्यापासून दूर राहतात. राहुल गांधी यांनी नुकतेच पक्षाचे सरचिटणीस बनवलेले अजय माकन हे ज्ये÷ नेत्यात सर्वात तरुण आहेत पण त्यांचे वय देखील 56 आहे. माकन हेदेखील थंडपणे काम करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. पंतप्रधान कार्यालयात बराच काळ राज्यमंत्री राहिलेले पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्ली कशी काम करते हे माहीत आहे. काँग्रेसची सहा वर्षापूर्वी महाराष्ट्रातून सत्ता गेल्यानंतर श्रे÷ाrंची त्यांच्यावर कितपत मर्जी आहे याबाबत उलटसुलट चर्चा आहे. अहमदभाईंच्या अगोदर काँग्रेस अध्यक्षांच्या राजकीय सचिव राहिलेल्या अंबिका सोनी या 78 वर्षांच्या असल्याने त्यांची निवृत्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. राजीव आणि सोनिया गांधींचे व्यक्तिगत सचिव म्हणून काम केलेले व्ही. जॉर्ज यांचा संघटना आणि सरकारमध्ये एकेकाळी दरारा होता. अहमदभाईंच्या उदयानंतर मात्र त्यांचे वजन रसातळाला गेले. एका पेट्रोलियम पंप घोटाळय़ात त्यांचे नाव आल्यानंतर जॉर्ज हे काँग्रेस अंतर्गत राजकारणात बाजूला फेकले गेले.
काँग्रेससमोर अस्तित्वाचे संकट उभे राहिले असताना अहमद पटेल यांच्यासारखा मॅनेजर गेल्याने गांधी घराण्यापुढे एक नवीन आव्हान उभे राहिले आहे. राजकारणाच्या आखाडय़ामधील वस्ताद असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृह मंत्री अमित शाह हे भाजपचे बळ वाढवण्याकरता रात्रीचा दिवस करत असताना राहुल गांधी यांचा नादानपणा संपण्याची अजिबात लक्षणे नाहीत ही धोक्मयाची घंटा काँग्रेससमोर वाजत आहे. अहमद पटेल यांच्या जागी एक चांगला मॅनेजर येऊन काँग्रेसपुढील संकट टळणार नाही. काँग्रेसमध्ये जान आणण्यासाठी एका चाणक्मयाची जरुरी आहे. मोदी-शहा यांना मात देणे सध्या कठीण दिसत असले तरी विरोधी पक्षांना चांगला रणनीतीकार भेटला तर या संकटाचे संधीत रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही.
सुनील गाताडे