मुलींच्या विवाहवयाचा मुद्दा
भोपाळ –
माजी मंत्री तसेच काँग्रेस नेते सज्जन सिंग वर्मा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान पेल आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी मुलींचे विवाहाचे वय 21 वर्षे करण्यासंबंधीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावर टिप्पणी करताना वर्मा यांनी मुली वयाच्या 15 व्या वर्षीच प्रजननक्षम होत असल्याने विवाहाचे वय 21 वर्षे करण्याची काय गरज असे विधान केले आहे.
डॉक्टरांनुसार मुलींमध्ये 15 व्या वर्षीच अपत्य जन्माला घालण्याची क्षमता निर्माण होते. याचमुळे त्यांच्या विवाहाच्या वयात बदल करण्याची कुठलीच गरज नसल्याचे वर्मा म्हणाले.
यापूर्वी मुख्यमंत्री चौहान यांनी एका कार्यक्रमात मुलींच्या विवाहाच्या वयावरून चर्चेची गरज असल्याचे म्हटले होते. तसेच त्यांनी विवाहाचे वय 18 वरून वचढवत 21 वर्षे करण्याची सूचना केली होती.