प्रतिनिधी/ कास
दुर्गम कांदाटी खोऱ्यातील वलवण ता.महाबळेश्वर या ठिकाणी सायाळाची शिकार केल्याप्रकरणी दोघांना अटक करून महाबळेश्वर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांचे समोर हजर केले असता पाच दिवसांची वनकोठडी ठोठावण्यात आली आहे.
बामणोली वनक्षेत्रपाल कार्यालय यांचेकडून दिलेल्या माहितीनुसार सह्याद्री व्याघ्र राखीव बामणोली परिक्षेत्रातील वलवण नियतक्षेत्रात दि.१२ रोजी लाकडी फास्यामध्ये साळीदर(सायाळ) अडकले असलेच्या गुप्त माहितीनुसार संशयित आरोपी महादेव कोंडीराम जाधव वय ५० वर्षे,पांडुरंग महादेव जाधव वय १९ वर्षे दोघेही राहणार उगवतीवाडी वलवण यांनी गुन्हा मान्य केला असून,त्यांचे विरुद्ध वन्यजीव अधिनियम सरंक्षण अधिनियम १९७२ चे कलम ९,२७,२९ अन्वये गुन्हा नोंद केला असून, आरोपींना महाबळेश्वर येथील प्रथम न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता. पाच दिवसांची वणकोठडी ठोठावण्यात आली आहे.कार्यवाहीमध्ये मा. सहाय्यक वनसंरक्षक सह्याद्री व्याघ्र राखीव सुरेश साळुंखे यांचे मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल बी.डी. हसबनिस, वनपाल सागर कुंभार, वनरक्षक स्वप्नील शेंडगे, अभिनंदन सावंत, सुमितकुमार चौगुले, राजेंद्र आवारे, रामेश्वर भोपळे यांनी सहभाग घेतला होता.