वार्ताहर / कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये परतीच्या पावसाचा धुमाकुळ कांदा, बटाटा, रताळी दरात वाढ झाली आहे. जुना कांदा 700 रु. नवीन कांदा 600 रु. सफेद कांदा 500 रु. वधारला आहे. स्थानिक बटाटा 300 रु. पुणा परिसरातील पुसेगावचा बटाटा 200 रुपयांनी वाढ झाला आहे. तर इंदोरचा बटाटा 200 रुपयांनी कमी झाला. रताळी दरात 200 रुपयांनी वाढ झाली आहे.
बेळगाव बाजारात कांदा आवक 35 ट्रक इतकी झाली. मागील बाजारपेक्षा 5 ट्रक कांदा आवक कमी झाली. याचा परिणाम जावकेत वाढ झाली असल्याने कांद्याचे भाव वधारले असल्याची माहिती व्यापारी दीपक गजानन पाटील यांनी दिली.
बाजारात 35 ट्रक कांदा आवक होती. त्यामध्ये नवीन कांदा आवक ही कर्नाटकातील होती. तर 5 ट्रक जुना कांदा सुद्धा कर्नाटकातून आला होता तर उर्वरीत 14 ट्रक जुना कांदा हा महाराष्ट्रातील पुणा परिसरातून आवक झाली होती. यामध्ये व्यापारी आणी शेतकरी बंधूंची आवक होती. तर सफेद कांदा आवक ही कर्नाटकातून 500 पिशव्या इतकी आवक झाली होती.
कांद्याचे भाव
नवीन कांदा
गोळी 500 ते 1500
गुल्टा 1600 ते 2500
मध्यम 2600 ते 3000
गोळा 3100 ते 3500
जुना कांदा 1000 ते 5500
सफेद कांदा 4000 ते 5000
बेळगाव बाजारात परराज्यातील बटाटा आवक 14 ट्रक इतकी होती. त्यामध्ये इंदोरचा बटाटा 10 ट्रक तर पुसेगावचा बटाटा 4 ट्रक इतकी आवक होती. बाजारात जवारी बटाटा आवक मोठय़ा प्रमाणात होत आहे. तर इंदोर बटाटा आवक सुद्धा वाढली. याचा परिणाम इंदोर बटाटा दर 200 रु. कमी झाले तर पुणे परिसरातील पुसेगावचा बटाटा हा या हंगामातील बटाटा असल्याने त्याला मागणी चांगली आहे. त्यामुळे त्याचा दर 200 वाढला असल्याची माहिती व्यापारी संजय पाटील यांनी दिली.
बेळगाव तालुका बटाटा उत्पादक क्षेत्रात परतीच्या पावसाचा व्यत्यय निर्माण होत आहे. बटाटा आवक बाजारात कमी झाली. याशिवाय यावर्षी बटाटा लागवड पण कमी आहे. मसार जमिनीतील आवक संपली आहे. त्यामुळे जवारी बटाटय़ाचे दर वाढले असल्याची माहिती व्यापारी प्रकाश पाटील यांनी दिली.
शनिवारपासुन नवरात्रोत्सवाला सुरुवात होत आहे. परतीच्या पावसाने रताळी उत्पादन क्षेत्रात धुमाकुळ घातला आहे. याचा परिणाम रताळी काढणीला अडचणी निर्माण झाल्या आहेत. याचा विपरीत परिणाम बाजारात रताळी आवक घटली. त्यामुळे दरात सुधारणा झाली असल्याची माहिती व्यापारी दत्ता पाटील यांनी दिली.
नवरात्रोत्सवापासून सर्वत्र मोठय़ा प्रमाणात उपवास, व्रताला सुरुवात होते. रताळी हे पीक उपवासासाठी वापरण्यात येते. शिवाय ते गरीबापासून ते श्रीमंतापर्यंत या पिकाला बाजारात मोठी मागणी असते. तसेच देशात परतीच्या पाऊस सुरु असल्याने थंडीचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. रताळी हे पिक शरिरात उष्णता निर्माण करते. त्यामुळे सुद्धा या पिकाला चांगली मागणी असते. पुढे रताळी पिकाला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे, असे व्यापारी वर्गातून व्यक्त करण्यात येत आहे.
रताळी पिकाचा भाव 900 ते 1300
स्थानिक बटाटा दर
गोळी 1000 ते 1200
मध्यम 2000 ते 2500
गोळा 2900 ते 3400
परराज्यातील बटाटय़ाचे दर
इंदोर 2600 ते 3300
पुसेगाव 1000 ते 3100