कांदोळीत सात फायबर बोटींना आग
वार्ताहर / कांदोळी
नेरूल भाटीवाडा येथे शिकेरी नदीच्या कडेला ठेवण्यात आलेल्या सात जलसफारी फायबर बोटीना आग लागून सुमारे 40 लाखाहून जास्त रुपयाने नुकसान झाले .यात 4 बोटी पूर्ण पणे जाळून खाक झाल्या. अग्निशमन दलाने त्वरित धाव घेतल्याने मोठा अनर्थ टाळला.
आज सकाळी 11ः00 वाजता नेरूल भाटीवाडा येथील बोटीने अचानकपणे पेटत घेतल्याचे पाहून नेरूल व शिकेरी ग्रामस्थ घटनास्थळी दाखल झाले , त्यानी आग विजविण्याचा प्रयत्न केला पण आग आटोक्मयात येत नसल्याचे पाहून ग्रामस्थाने पिळर्णच्या व म्हापसाच्या अग्निशामक दलाला संपर्क साधण्यात आला त्यानंतर बबांच्या सहाय्याने अग्निशामकच्या पदाधिकाऱयाने आग आटोक्मयात आढण्यात यशस्वी प्रयत्न केला . यावेळी आग कशी लागली ,याचे कारण समजू शकले नसले तरीदेखील आग शेतात सर्वत्र ठिकाणी कशी पसरली अशी शंका व्यक्त केली जात आहे
.आग आटोक्मयात आणण्यासाठी पिळर्णहून दोन व म्हापसाहून एक एकूण मिळून तीन बंब लागले. पिळर्ण अग्निशामक दलाचे अधिकारी नरेंद्र शेटये तसेच म्हापसा अग्निशामक दलाचे बोस्को फेराव यांच्या मार्गदर्शनाखाली विदेश म्हापसेकर,निलेश गावानेकर , प्रितेश मालवणकर ,जितेंद्र बाली व रूदेश पांढरे तसेच म्हापसा चे उप अधिकारी dब्हेप्war सावंत, वासू थिटे, अशोक न्aत्न्aग्क्ar, नितीन चोडणकर यानी आग विजविण्यास प्रयत्न केले . बोट मालक मिलटन फर्नांडिस,डोमनिक फर्नांडिस ,व्यलीटीनो लोबो ,निर्मला फर्नांडिस,ज्योकिम फर्नांडिस पट्रिसिन रॉड्रिगिस,पास्कॉल डिसोजा,सिद्धेश शिरोडकर यांच्या बोटी आगीत खाक झाल्या.
देशात कोरोनाच्या माहामारी मुळे देशात लावण्यात आलेल्या लॉकडावन व पर्यटन व्यवसाय बंद पडल्यामुळे 100हून जास्त फायबर बोटी या नदीच्या काठावर ठेवण्यात आल्या होत्या .आज सकाळी अचानकपणे बोटीना आग लागल्याचे पाहाताच ग्रामस्थां®ााr तत्परता व अग्निशामक दलाच्या प्रयत्नाने आग विजवून मोठा अनर्थ टळला. सध्या जलसफारीचा पर्यटन व्यवसाय बंद पडल्याने या पर्यटन व्यवसायावर अवलंबून असलेले अनेक शिकेरी व नेरूल नागरिकाचे जीवन सद्या संकटात आले आहे. त्यांचे आज उपजीविकाचे साधन नष्ट झाले आहे, असे यावेळी फिलिप फर्नांडिस यानी सांगितले.
राज्य सरकारने अशा या नुकसानग्रस्त बोटमालकांना नुकसान भरपाई देऊन आदार द्यावा आशी मागणी ग्रामस्थ फिलिप फर्नांडिस व इतर ग्रामस्थांनी केली आहे.
नेरूल शिकेरी नदीच्या काटावर खास करून भाटीवाडा येथील दारू व ड्रग्सचा वापर मोठय़ा प्रमाणात होत असल्याचे सांगण्यात येत आहे. कांदोलि ,कळगुट वेरे व इतर गावचे युवक या ठिकाणी येऊन अमली पदार्थाचा व्यवसाय करत असल्याची तक्रार पर्वरी पोलिसात केली आहे. पण त्याचा काहीच परिणाम होत नसल्याने येथील ग्रामस्थांनी चिंता व्यक्त केली आहे. या ठिकाणी ड्रग्सचा वापर थांबवण्यासाठी पर्वरी पोलिसांनी जलद गतीने कारवाई करावी व येथे चालू असलेला ड्रग्सचा व्यवसाय बंद पडावा अशी मागणी यथील ग्रामस्थांनी केली आहे.