प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना संसर्ग रोखण्यासाठी आता ग्रामीण भागातील जे संशयित रुग्ण आहेत त्यांची रॅपिड आणि ऍन्टिजेन टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. सामेवारी जिल्हाधिकाऱयांकडून याला चालना देण्यात आली. आता काकती येथेही या टेस्टला सुरुवात करण्यात आली आहे.
तालुका पंचायत सदस्य यल्लाप्पा कोळेकर व आरोग्य विभागाच्या अधिकाऱयांनी घरोघरी जाऊन ज्यांना लक्षणे असतील त्यांची रॅपिड टेस्ट करण्यास सुरुवात करण्यात आली. बेळगाव तालुक्मयातील अनेक गावांमध्येही आता प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून ही मोहीम तीव्र करण्यात आली असून काकती येथे याला चालना देण्यात आली.
कोरोना हा मोठा आजार नाही. मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली आहे. कोरोना प्राथमिक स्वरुपात असताना वेळीच उपचार झाले तर रुग्णाला काहीच त्रास होणार नाही. याचबरोबर घरातील इतर सदस्यांनाही त्याची लागण होणार नाही. तेंव्हा वेळीच उपचार घेतल्यास कोरोना बरा होवू शकतो, असे यल्लाप्पा कोळेकर यांनी सांगितले.