प्रतिनिधी / कागवाड
आजच्या स्पर्धात्मक युगात प्रत्येक युवकाने ज्ञान संपादन करून स्वतःच्या आत्मनिर्भर होण्यासाठी प्रत्येकाने नोकरीच्या मागे न धावता कमी खर्चात अधिक उत्पादन मिळविणारी सेंद्रिय शेती पद्धत अवलंबणे गरजेचे आहे. यामुळे शेतीची नासाडी होत नाही. शिवाय आपण उत्पादन केलेल्या मालाला योग्य दर मिळते. याचेच प्रत्यय कागवाड येथील पदवीधर युवा अजित गुंड्डप्पा चौगुले या शेतकऱयाने 39 गुंठय़ात 120 टन उसाचे उत्पादन घेऊन युवा शेतकऱयांना शेतीकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरित केले आहेत.
कागवाड येतील अजित गुंड्डप्पा चौगुले या शेतकऱयाने यापूर्वीपासून सेंद्रिय शेती पद्धत करीत वेगवेगळय़ा पिकांमध्ये अधिक उत्पादन घेऊन आपला शेती कामावर ठसा उमटविला आहे. याची दखल अनेक संस्थेने घेऊन त्यांना पुरस्कारही दिला आहे. आज या शेतकऱयाने शेंद्रीय उसाची शेती पद्धतीने लागवड करून आपला ठसा उमटविला आहे.
अजित चौगुले यांनी ऊस लागवडी पूर्वी 39 गुंठे क्षेत्रामध्ये मशागत करून शेण खत, कोंबडी खत घालून उसाचे बियाणे लागवड करून त्याने देशी गायीचे मुत्र वखत एकत्रित करून त्याचे उसाच्या पाला व शिंपडणे करून नंतर आग्रो आय.एम.सी बूस्टर व तसेच तुळशी रसाचे पिंपरणे करून ऊस तोडणीपर्यंत अवघ्या 20 हजार रुपये खर्चामध्ये पिकाची निर्मिती केले आहे.
महाराष्ट्रातील इतर साखर कारखान्याकडून सुमारे प्रतिटनाला 3 हजार रुपयांची रक्कम देण्यात येत आहे. 120 टन उसाला साधारण 3 लाख 60 हजार रुपये उत्पादन होते. सेंद्रीय शेती पद्धतीत कमी खर्चात अधिक उत्पादन घेणे शक्मय झाले आहे. सेंद्रीय पद्धतीने ऊस लागवड करून एक आदर्श निर्माण केला आहे. या शेतकऱयाचे इतर युवा शेतकऱयांनी अनुकरण करून शेती करावे.
आज पर्यंत अनेक शेतकऱयांनी पारंपरिक पद्धतीने उसाची लागवड करीत आले आहेत. यांनी अधिक प्रमाणात पाणी देणे, शिवाय रासायनिक खताचा अधिक वापर करणे, यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील लाखो एकर शेती पूर्णपणे क्षारपड बनले आहे. शेतकऱयांच्या नावे सातबारावर शेतीची नोंद आहे. पण प्रत्यक्षात त्या शेतामध्ये बळ्ळारी बाबळ फोपटले आहे. यामुळे शेतकरी आर्थिक संकटात आहे. या संकटातून मुक्त होण्यासाठी प्रत्येक युवा शेतकऱयांनी सेंद्रीय शेती पद्धतीचा अवलंब करून शेती केल्यास शेती फायदेशीर ठरणार आहे हे निश्चित. अजित चौगुले यांना त्यांची मुले अभिनंदन व अमोल यांनी साथ दिली आहे.