प्रतिनिधी/ कागवाड
राज्य शासनाने कागवाड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे शहरवासियांतून आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी कागवाडला तालुक्मयाचा दर्जा मिळाला आहे. मात्र, कागवाड ग्रामपंचायतीचा दर्जा वाढविण्यात आला नव्हता. आता मंत्रिमंडळ बैठकीत कागवाड ग्रामपंचायतीला नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आल्याने विकासकामांना गती मिळणार आहे. त्याचबरोबर शासनाकडून खास आर्थिक पॅकेज व शहराला नव्या सुविधा मिळणार आहेत.
कागवाडची सन 2011 जनगणतीनुसार 14 हजार 244 इतकी लोकसंख्या आहे. येथे 13 प्रभाग असून 35 ग्रामपंचायत सदस्य संख्या आहे. आता नगरपंचायतीचा दर्जा दिल्याने प्रभाग संख्या 14 झाली आहे. तर 2011 पासून 2020 पर्यंत 15 हजार जनसंख्या झाली असून आता 14 प्रभागातून 14 सदस्य निवडून येणार आहेत. नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने शासनाकडून स्वतंत्रपणे रस्ते, गटार व शुद्ध पाणीपुरवठा योजनेसाठी खास अनुदान मिळणार आहे.
कागवाडला नगरपंचायतीचा दर्जा मिळावा, यासाठी 3 वर्षांपूर्वी कागवाडचे ज्ये÷ नेते दिवंगत ज्योतगौडा पाटील, दिवंगत सिद्दगौडा पाटील यांनी तत्कालीन आमदार राजू कागे, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्याशी चर्चा करून पाठपुरावा केला होता. राज्यात भाजपची सत्ता असल्याने शिवाय कागवाडचे आमदार व वस्त्रोद्योग मंत्री श्रीमंत पाटील यांनी कागवाडला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनदरबारी निरंतर पाठपुरावा केला. यासाठी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनीही विशेष प्रयत्न केले आहे. याचबरोबर ग्रा. पं. अध्यक्षा श्रीदेवी चौगुले, सदस्य रमेश चौगुले व ता. पं. सदस्य ज्योती देवणे व ग्रा. पं. सदस्यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.
आमचे नेते मंत्री श्रीमंत पाटील, उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांनी कागवाडला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे. त्यांचा आभार मानून कागवाड गावाला नगरपंचायतीचा दर्जा देऊन गावच्या विकासासाठी प्रयत्न केल्याने कागवाडला तालुक्मयाचा दर्जा मिळाला आहे. आता नगरपंचायतीचा दर्जा मिळाल्याने विकास होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
जिल्हा पंचायती सदस्य, अजित चौगुले(फोटो)
कागवाड गावचे ग्रामपंचायतीचे अध्यक्षा श्रीदेवी सदाशीव चौगुले म्हणाल्या, राज्य सरकार, पंचायती राज्य विभाग तसेच कागवाड चे आमदार, उपमुख्यमंत्री यांना धन्यवाद देऊन कागवाड गावच्या विकासासाठी शासन दरबारी आमच्या मागण्या लाउन-धरुन त्याला मंजूरु मिळवुन दिले आहेत. सध्या नवा तालुका आहे. आता नगरपंचायत होणार आहे. महाराष्ट्र-कर्नाटक राज्याचे सीमेवरील कागवाड गाव शहरात रुपांतर झाले आहे. आम्ही धन्य आहोत असे त्यांनी म्हणाले.