प्रतिनिधी/ कागवाड
राज्य अंगणवाडी सेविका, अक्षरदासोह सेविका व ग्रामपंचायत कामगार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मागण्यांचे निवेदन कागवाडच्या तहसीलदार प्रमिळा देशपांडे यांना देण्यात आले. गुरुवारी येथील राणी चन्नम्मा सर्कलपासून तहसीलदार कार्यालयापर्यंत अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कामगारांनी मोर्चा काढला. त्यानंतर धरणे आंदोलन करून केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा दिल्या.
निवेदनात, अंगणवाडी सेविकांना कनि÷ 21 हजार रुपये वेतन द्यावे. निवृत्तीनंतर 10 हजार रुपये पेन्शन, सेवा जे÷तेनुसार वेतन निश्चित करावे, अक्षरदासोह अंतर्गत असणाऱया कामगारांना नवीन शिक्षण कायद्याप्रमाणे काम मिळावे. जेवण बनवण्याचे कंत्राट कोणत्याही खासगी संस्थांना देऊ नये. कोरोनामुळे शाळा बंद करण्यात आल्याने कर्मचाऱयांचे हाल होत आहे. यासाठी सरकारने या कामगारांना वेतन द्यावे. तसेच प्रत्येक महिन्यातील 5 तारखेच्या आत वेतन अदा करावे. याचबरोबर गरम जेवण बनवणाऱया महिला कर्मचाऱयांची सरकारी कर्मचारी म्हणून नोंद करून घ्यावी, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत कर्मचारी संघाचे संचालक सोमू कट्टी म्हणाले, अथणी व कागवाड तालुक्मयात 55 ग्रामपंचायती कार्यरत आहेत. यातील 250 कामगार निराधार आहेत. त्यामुळे शासानाने या कामगारांना सर्व सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी त्यांनी केली. अंगणवाडी सेविका संघाच्या अध्यक्षा सुवर्णा कमतगे यांनी तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन स्वीकारून तहसीलदार प्रमिळा देशपांडे यांनी शासनदरबारी निवेदन देऊन समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
यावेळी कागवाडचे सीडीपीओ संजीव सदलगे, उपतहसीलदार आण्णासाहेब कोरे, सविता हिरेमठ, अंजना ढाले, सेवंता गुंजाळे, सुमन पाटील, अंजना पाटील, दीपा सोनार, इंदुमती बिळगी, शरावती भिडे, सीमा कांबळे यांच्यासह अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, अक्षरदासोह सेविका उपस्थित होत्या.