ऑनलाईन टीम / कानपूर :
कानपूरच्या बिल्हौर मधील ककवन भागातील विषधन मोहल्यात दिल्लीतून आलेला नवरदेव कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नवरदेवाची 17 जून रोजी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर रविवारी त्याचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. 19 जूनला बैडी गावात त्याचे लग्न झाले होते.
ककवन मधील सीएचसीच्या डॉक्टरांनी नवरदेवाला कोविड रुग्णालयात दाखल केले आहे. तर नवऱ्यामुलीसह 11 जणांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर संबंधित युवक 14 जून रोजी दिल्लीतून गावात आला होता तसेच स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचे पालन देखील करण्यात आले नव्हते.