ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :
केंद्र सरकारच्या आर्थिक आणि कामगारविरोधी धोरणांच्या निषेधर्थ विविध कामगार संघटनांनी आज, भारत बंदची हाक दिली आहे. या बंदला काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहूल गांधी यांनी समर्थन दिले आहे.
राहूल गांधी यांनी याबाबत ट्विट करुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ‘मोदी-शाह यांच्या सरकारद्वारे लागू केलेल्या जनविरोधी, कामगारविरोधी धोरणांनी देशात बेरोजगाराची स्थिती तयार केली आहे. तसेच, यासोबत पीएसयू ला कमकुवत केले जात आहे. यामुळे देशातील 25 कोटी कर्मचाऱयांनी बंद पुकारला आहे. तर मी त्या सर्व कर्मचाऱयांना सलाम करतो.
दरम्यान, पंजाब आणि हरियाणामध्ये सार्वजनिक बँका, परिवहन विभाग, पोस्ट ऑफीस व शेतकरी संघटनांनी सहभाग घेतला आहे.