विविध कंपन्यांकडून हायब्रिड संकल्पनेवर भर: कर्मचाऱयांना किमान दोन वेळा कामावर यावे लागणार
मुंबई
आयटी क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आता जास्तीत जास्त कर्मचारी कार्यालयामधून काम करण्यास प्रारंभ करत आहेत. साधारणपणे आता हायब्रिड संकल्पना सादर केली जात आहे. यामुळे एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापासून कर्मचाऱयांना किमान दोन दिवस ऑफिसला जाणे सक्तीचे असणार असल्याची माहिती आहे.
प्रमुख कंपन्यांकडून कार्यालयात बोलावणे सुरु
टेक कंपनी इन्फोसिसने आपल्या कार्यालयात कर्मचाऱयांना पुन्हा वर्क फ्रॉम होम नंतर बोलावण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये आठवडय़ातील निवडक वेळी येण्यासाठी कर्मचाऱयांना प्रोत्साहन दिले जात आहे.
3 मार्चपासून विप्रो कर्मचाऱयांना बोलावणार
विप्रोने या अगोदरही म्हटले आहे तसे वरिष्ठ कर्मचारी 3 मार्चपासून आठवडय़ातील कमीत कमी दोनवेळा आपल्या कर्मचाऱयांना कार्यालयात बोलावणार आहे.
इन्फोसिसचे 96 टक्के कर्मचाऱयांचे वर्क फ्रॉम होमच
साधारणपणे इन्फोसिसचे जवळपास 96 टक्के कर्मचारी घरातून काम करत आहेत. आणि आगामी 3 ते 4 महिन्यात महामारी सारखी स्थिती पूर्णपणे कमी झाल्यानंतर कंपनी जास्तीत जास्त कर्मचाऱयांना कार्यालयात बोलावण्यावर भर देणार आहे. यामुळे भविष्यात हायब्रिड संकल्पना मोठय़ा प्रमाणात रुजवण्यास सुरुवात होणार असल्याची माहिती आहे. दुसऱया बाजूला जवळपास 18 टक्के कर्मचारी कार्यालयातून काम करत आहेत.
एचसीएल अजून विचार करणार
तिसऱया क्रमांकाची सर्वात मोठी सॉफ्टवेअर सर्व्हिस फर्म एचसीएल टेक्नालॉजीसने म्हटले आहे, की एचसीएलमध्ये आमचे सर्वोच्च प्राधान्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची सुरक्षा यालाच असणार असल्याचे कंपनीच्या अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. कर्मचाऱयांना परत बोलावण्याबाबत स्पष्टता मात्र कंपनीने केलेली नाही.
टीसीएसची रिमोट वर्किंग पॉलिसी
मागील महिन्यात भारतामधील सर्वात मोठी सॉफ्टवेअर सेवा फर्म टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने रिमोट वर्केंग पॉलिसी राबवली आहे. तसेच सहयोगी लोक घरातून काम करत आहेत. कर्मचाऱयांना पाठविलेल्या ईमेलनुसार कर्मचारी आपल्या राहत्या ठिकाणाहून काम करु शकणार असल्याचे संकेत आहेत.