प्रतिनिधी/ रत्नागिरी
विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपात सहभागी असलेले प्रमादीय कर्मचारी कामावर हजर झाल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कोणतीही कारवाई करणार नाह़ी त्यामुळे कर्मचाऱयांनी अफवांवर विश्वास न ठेवता कामावर हजर रहावे, असे आवाहन रत्नागिरी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे यांनी केले आह़े या संबंधी जाहीर आवाहनाचे पत्रक रत्नागिरी विभाग नियंत्रक कार्यालयाकडून जारी करण्यात आले आह़े
एसटी कर्मचारी कामावर हजर राहण्यासंबंधी कर्मचाऱयांमध्ये संभ्रमाचे वातावरण असल्याचे एसटी विभागाच्या निदर्शनास आले आह़े या अनुषंगाने ऍड. अनिल परब यांनी 26 जानेवारी रोजी रत्नागिरी विभागाला भेट दिली होत़ी त्यावेळी परब यांनीही शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट केले होत़े कामावर हजर राहणाऱया कर्मचाऱयावर भविष्यात कोणत्याही स्वरूपाची शिस्तभंगाची कारवाई करण्याचा एसटी रत्नागिरी विभागाचा मानस नाह़ी त्यामुळे कर्मचाऱयांनी कोणत्याही दडपणात न राहता तसेच दबावाला बळी न पडता कर्तव्यावर हजर रहावे, असे आवाहन बोरसे यांनी निवेदनात केले आह़े
दरम्यान जिह्यात सोमवारीही एसटीच्या 350 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तर 562 कर्मचारी हजर झाले आहेत़ तर 267 अधिकृत रजेवर असणाऱया कर्मचाऱयांचाही समावेश आह़े हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 136 प्रशासकीय, 205 कार्यशाळा, 86 चालक, 70 वाहक, 65 चालक तथा वाहक आदींचा समावेश आह़े कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले. एसटीच्या दरदिवशी चालणाऱया फेऱयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आह़े शनिवारी एकूण 26 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आह़े