जिल्हाधिकाऱयांना दिले निवेदन
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनामुळे यावषी उद्योग खात्री योजनेंतर्गत कामगारांना कामच देण्यात आले नाही. याचबरोबर रेशनही मिळाले नाही. वर्ष संपायला आले तरी काम नाही. तेंव्हा तातडीने काम द्यावे, याचबरोबर मजुरीमध्ये वाढ करावी, या मागणीसाठी ग्रामीण कुली कामगार संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढुन निवेदन देण्यात आले. यावेळी केंद्र आणि राज्य सरकारचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला.
कोरोनामुळे रोजगार हमी योजनेंतर्गत कोणतीच कामे सुरू करण्यात आली नाहीत. वास्तविक रोजगार कामगारांना काम देणे गरजेचे असताना त्याकडे बहुसंख्य ग्राम पंचायतीने दुर्लक्ष केले आहे. वर्षाला 120 दिवस काम दिले पाहिजे. मात्र आतापर्यंत केवळ 10 ते 15 दिवस काम काहीच ग्राम पंचायतीने काम दिले आहे. वर्ष संपण्यास केवळ एक महिना बाकी असून तेंव्हा आता उर्वरित संपूर्ण दिवस काम द्यावे. याचबरोबर दिवसाची मजुरीही द्यावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
महागाईमुळे कामगारांना जीवन जगणे कठीण असून मजुरीमध्ये वाढ करावी, अशी मागणी देखील करण्यात आली आहे. किमान 600 रुपये मजुरी द्यावी, असेही या निवेदनात म्हटले आहे. रेशन केवळ दोन ते तीन महिनेच देण्यात आले. त्यानंतर रेशन देखील बंद करण्यात आले आहे. तेंव्हा आणखी सहा महिने रेशन द्यावे, अशी मागणी देखील करण्यात आली.
महसूल अधिकारी एस. एम. परगी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी व्ही. एस. हिरेमठ, अशोक हेरेकर, भारती भांदुर्गे, अनिता कागणिकर, शांता अजानी, उषा मोहीते, गंगव्वा पाटील, रुपा मेटगुडली यांच्यासह महिला कामगार उपस्थित होत्या..